Wednesday, 1 November 2017

राज्यातील नवबौध्द समुदायास बौद्ध समाजाप्रमाणे अल्पसंख्याक विकास विभागाच्या सर्व सुविधा / योजनांचा लाभ अनुज्ञेय असल्याबाबत.

राज्यातील नवबौध्द समुदायास बौद्ध समाजाप्रमाणे अल्पसंख्याक विकास विभागाच्या सर्व सुविधा / योजनांचा लाभ अनुज्ञेय असल्याबाबत.

official link
https://www.maharashtra.gov.in/1145/Government-Resolutions

सांकेतांक क्रमांक :: 201709281611349814


GR download link

Wednesday, 18 October 2017

*"जातीभेद ही वरून वाहत आलेली गटारगंगा आहे - बाबासाहेब"*

*"जातीभेद ही वरून वाहत आलेली गटारगंगा आहे- बाबासाहेब"*
प्रथमतः अस्पृश्य समाजात मोडणाऱ्या महार, चांभार, भंगी, मातंग वगैरे ज्या जाती आहेत त्यात एकी नाही हे आपण सर्वांचे दुर्दैव होय. ही एकी नसण्याचे खरे कारण म्हणजे
हिंदुसमाजातील जातीभेद हेच आहे. ह्या जातिभेदाला महार, मांग, चांभार किंवा भंगी हे जबाबदार नाहीत. जातीभेद ही वरून वाहत आलेली गटारगंगा आहे हा आपल्याकडे वाहत येणारा नरक आहे आणि त्यामुळे जातीभेदाची कटू फळे व त्याचा दुष्परिणाम आपल्याला सोसावा लागत आहे आणि खेदाची गोष्ट हि कि, हे हिंदुलोक जातीभेद तर दूर करीत नाहीतच उलट अस्पृश्यांच्या अज्ञानाचा फायदा घेऊन त्यांचा जातीभेद दृढ करावयास झटतात.. मातंगांना हाती धरून महाराविरुद्ध उठवावयाचे.. चांभारांना हाती धरून त्यांना महार-मांगाविरुद्ध उठवावयायचे व भेद्निती आमच्यात पसरावयाची आणि आपली एकी होऊ द्यावयाची नाही मात्र
या जातीभेदाची मूळ जबाबदारी जरी हिंदूसमाजावर असली तरी आपण आपली जबाबदारी विसरणे आत्मघाती ठरेल.. आपल्यातील जातीभेद नाहीसे करणे व आपल्यात भेद्नितीचा फैलाव न होऊ देणे हे आपले आद्यकर्तव्य आहे आणि आपण हे साधल्याशिवाय आपला उत्कर्ष कधी होणार नाही. महार-मांगातील-चांभारामधील रोटिबंदी , बेटीबंदी अजिबात नष्ट झाली पाहिजे.. प्रत्येक जात जर आपली शेखी मिरविण्याकरिता आपल्या जातीसच चिकटून राहील.. महार महारच राहील व मांग मांगच.. चांभार..भंगी च राहील तर आपल्यावर होणाऱ्या अन्यायाचा प्रतिकार आपण करू शकणार नाही. "महार किंवा मांग.. चांभार या नावात असे काय आहे कि त्यात तुम्हांला अभिमान वाटावा?? या नावाने असा कोणता उज्वल इतिहास तुमच्या डोळ्यासमोर राहतो कि जुनी परंपरा चालू ठेवण्यास तुम्ही झटावे?" सर्व समाज या नावांना तुच्छ लेखित आहे तुम्हांला आज उकिरड्यावरील कचऱ्याची देखील किंमत नाही तेव्हा या नावाचा अभिमान न बाळगता आपले दोनही समाज एका वरवंटयाखाली चिरडले जात आहेत, हे जाणले पाहिजे दोघांनी एकजुटीने राहिले पाहिजे.. आपल्याला गरीब जनतेचे म्हणजे आपले स्वतःचे जिणे सुखाचे करावायचे आहे म्हणून आपण आपलीच शक्ती वाढविली पाहिजे आहे !!
विचार- विश्वरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर
संदर्भ- पंढरपूर कुर्डूवाडी येथील बाबासाहेबांचे भाषण ३१-१२-१९३७

एससी, एसटी च्या निधीवर मुख्यमंत्र्यांचा दरोडा

Tuesday, 11 April 2017

११ एप्रिल देशातील पहिल्या सत्यशोधक चळवळीचे संस्थापक,स्त्री शिक्षणाचे जनक राष्ट्रपिता महात्मा ज्योतिबा फुले यांच्या जयंती महोत्सवास विनम्र अभिवादन.

११ एप्रिल क्रांतीसुर्य महात्मा जोतीराव फुले यांची जयंती...

११ एप्रिल -
क्रांतीसुर्य महात्मा जोतीराव फुले या महामानवाचा जन्म दिवस.

११ एप्रिल -
एका सत्यशोधकांचा जन्म दिवस.

११ एप्रिल -
२०० वर्षे झाकुण ठेवलेली रायगडावरील छत्रपती  शिवराय यांची समाधी शोधुन पहिली शिवजयंती साजरी करणाऱ्या महापुरूषांचा जन्म दिवस.

११ एप्रिल -
छत्रपती शिवराय यांच्या जीवन चरित्रावर पहिला पोवडा करणाऱ्या शाहीराचा जन्म दिवस.

११ एप्रिल -
भारतरत्न , कायदे तज्ञ, संविधानकार डॉ. बाबासाहेब आबेडकर यांच्या महागुरू चा जन्म दिवस.

११एप्रिल -
मुलींना शिक्षणाची दरवाजे ऊघडी करून देणाऱ्या शिक्षकाचा जन्म दिवस.

११ एप्रिल -
स्त्री शिक्षणात व इतर समाज कार्यात स्वत: च्या पत्नीला खंबीरपणे ऊभे करणारे महामानव यांचा जन्म दिवस.

११ एप्रिल -
सतीची चाल, केश वपन इत्यादी समाजातील अनिष्ठ चाली-रितींचा नायनाट करणाऱ्या समाजप्रबोधनकार यांचा जन्म दिवस.

११ एप्रिल -
उच्चभ्रु ब्राम्हण संस्कृती ने निर्माण केलेल्या शुद्र-अतिशुद्र या गलिच्छ विचारांचा नाश करून माणसांना माणसात बसवणाऱ्या महा-मानवाचा जन्म दिवस.

११ एप्रिल -
दलितांना पिण्याच्या पाण्यासाठी स्वत: ची विहीर सदैव बहाल करणाऱ्या महा-पुरूषांचा जन्म दिवस.

११ एप्रिल -
बहुजण समाजाला सर्व क्षेत्रापासुन वंचित ठेवणारे खरे दुश्मन शोधुन बहुजण समाजाला सत्याचा मार्ग दाखवणाऱ्या महासंशोधकांचा जन्म दिवस .

|| जय जोती जय क्रांती ||


...महात्मा जोतिबा फुले यांचा जिवनपट:-
इ.स. ११ एप्रिल १८२७ - जन्म.
इ.स. १८३४ ते १८३८ - पंतोजींच्या शाळेत शिक्षण झाले.
इ.स. १८४० - सावित्रीबाईंशी विवाह.
इ.स. १८४१ ते १८४७ - स्कॉटिश मिशन हायस्कूलमध्ये इंग्रजी शिक्षण घेतले.
इ.स. १८४७- लहुजी वस्ताद साळवे दांडपट्टा व इतर शारीरिक शिक्षण घेतले.
इ.स. १८४७ - थॉमस पेन यांच्या 'राईट ऑफ मॅन' या ग्रंथाचा अभ्यास.
इ.स. १८४८ - मित्राच्या विवाहप्रसंगी निघालेल्या मिरवणुकीत उच्चवर्णीयांकडून अपमान झाला.
इ.स. १८४८ - भारतातील मुलींची पहिली शाळा सुरू केली. बहुजन समाजाच्या शिक्षणासाठी काम सुरू केले.
इ.स. १८४९ - वरील कारणांमुळे वडिलांशी मतभेद व गृहत्याग
सप्टेंबर ७, इ.स. १८५१ - भिडे वाड्यात व रास्ता पेठेत मुलींच्या शाळेची सुरुवात.
इ.स. १८५२ - पूना लायब्ररीची स्थापना.
मार्च १५, इ.स. १८५२ - वेताळपेठेत अस्पृश्यांसाठी पहिली शाळा सुरू केली.
नोहेंबर १६, इ.स. १८५२ - मेजर कॅन्डी यांच्याकडून शैक्षणिक कार्यासाठी ब्रिटिश सरकारतर्फे विश्रामबाग वाड्यात सत्कार.
इ.स. १८५३ - 'दि सोसायटी फॉर प्रमोटिंग द एज्युकेशन ऑफ महार मांग ॲन्ड अदर्स' स्थापन केली.
इ.स. १८५४ - स्कॉटिश मिशनच्या शाळेत अर्धवेळ शिक्षकाची नोकरी
इ.स. १८५५ - 'तृतीयरत्न' नाटकाचे लेखन.
इ.स. १८५५ - रात्रशाळेची सुरुवात केली.
इ.स. १८५६ - जोतीबांवर मारेकरी घालून हत्येचा प्रयत्न झाला.
इ.स. १८५८ - शाळांच्या व्यवस्थापन मंडळातून निवृत्ती घेतली.
इ.स. १८६० - विधवा पुनर्विवाहास साहाय्य केले.
इ.स. १८६३ - बालहत्या प्रतिबंधक गृहाची स्थापना केली .
इ.स. १८६५ - विधवांच्या केशवपनाविरुद्ध न्हाव्यांचा संप घडवून आणला.
इ.स. १८६४ - गोखले बागेत विधवाविवाह घडवून आणला.
इ.स. १८६८ - वडील गोविंदराव यांचा मृत्यू
इ.स. १८६८ - दुष्काळ काळात राहत्या घरातील हौद अस्पृश्यांसाठी खुला केला.
इ.स. १८७३ - 'गुलामगिरी' ची लेखन
इ.स. १८७३ - सत्यशोधक समाजची स्थापना केली.
इ.स. १८७५ - शेतकऱ्यांच्या शोषणाविरुद्ध खतफोडीचे बंड घडवून आणले ( अहमदनगर).
इ.स. १८७५- स्वामी दयानंद सरस्वतींची पुण्यात मिरवणूक काढण्यास साहाय्य केले.
इ.स. १८७६ ते १८८२ - पुणे नगर पालिकेचे सदस्य होते.
इ.स. १८८० - दारूची दुकाने सुरू करण्यास विरोध केला.
इ.स. १८८० - नारायण मेघाजी लोखंडे यांना 'मिलहॅण्ड असोसिएशन' या देशातील पहिल्या कामगार संघटनेच्या स्थापनेत साहाय्य केले.
इ.स. १८८२ - 'विल्यम हंटर शिक्षण आयोगा' समोर निवेदन दिले. यात प्राथमिक शिक्षण सक्तीचे व मोफत देण्याची मागणी केली.
इ.स. १८८३ - 'शेतकऱ्याचा आसूड'चे लेखन
इ.स. १८८७ - सत्यशोधक समाजातर्फे नवीन मंगलाष्टकांची व नवीन पूजाविधीची रचना करून पुरोहिताशिवाय विवाह घडवून आणण्यास सुरुवात केली.
इ.स. १८८८- ड्यूक ऑफ कॅनॉट यांची भेट आणि सत्कार.
इ.स. १८८८ - मुंबईतील कोळीवाडा येथे जनतेने रावबहादुर वडेकर यांच्या हस्ते सत्कार करून 'महात्मा' ही पदवी प्रदान केली.
२८ नोव्हेंबर, इ.स. १८९० - पुणे येथे निधन झाले
🏻.जय जोति....🏻

Tuesday, 7 February 2017

🔵👉🏻.. ७ फेब्रुवारी २०१७ माता "रमाई भीमराव आंबेडकर" १२०वी जयंती..👈🏻🔵

🔵👉🏻.. ७ फेब्रुवारी २०१७ माता "रमाई भीमराव आंबेडकर" १२०वी जयंती..👈🏻🔵

७ फेब्रुवारी १८९७ "माता रमाई भीमराव आंबेडकर" जयंती निमित्त "माता रमाईला" माझा कोटी-कोटी प्रणाम..🙏🏻

रमाई म्हणजे कठोर कर्तव्यनिष्ठेचे मुर्तिमंत प्रतिक, तिच्या कर्तव्यकठोर निष्ठेतुनच भारत देशात भारतीय घटनेचे शिल्पकार तसेच कोहिनुर हि-या समान डाॅ. बाबासाहेब आंबेडकरांन सारखा दैदिव्यमान सुर्य या जगास लाभला.

माता "रमाई भीमराव आंबेडकर" यांच्या१२०व्या जयंतीनिमित्त माता रमाईस कोटी-कोटी वंदन..🙏🏻🙏🏻सर्वांना हार्दीक हार्दीक शुभेच्छा...💐💐💐

🙏🏻..जय भीम..🙏🏻
🙏🏻..जय माता रमाई..🙏🏻