Tuesday, 11 April 2017

११ एप्रिल देशातील पहिल्या सत्यशोधक चळवळीचे संस्थापक,स्त्री शिक्षणाचे जनक राष्ट्रपिता महात्मा ज्योतिबा फुले यांच्या जयंती महोत्सवास विनम्र अभिवादन.

११ एप्रिल क्रांतीसुर्य महात्मा जोतीराव फुले यांची जयंती...

११ एप्रिल -
क्रांतीसुर्य महात्मा जोतीराव फुले या महामानवाचा जन्म दिवस.

११ एप्रिल -
एका सत्यशोधकांचा जन्म दिवस.

११ एप्रिल -
२०० वर्षे झाकुण ठेवलेली रायगडावरील छत्रपती  शिवराय यांची समाधी शोधुन पहिली शिवजयंती साजरी करणाऱ्या महापुरूषांचा जन्म दिवस.

११ एप्रिल -
छत्रपती शिवराय यांच्या जीवन चरित्रावर पहिला पोवडा करणाऱ्या शाहीराचा जन्म दिवस.

११ एप्रिल -
भारतरत्न , कायदे तज्ञ, संविधानकार डॉ. बाबासाहेब आबेडकर यांच्या महागुरू चा जन्म दिवस.

११एप्रिल -
मुलींना शिक्षणाची दरवाजे ऊघडी करून देणाऱ्या शिक्षकाचा जन्म दिवस.

११ एप्रिल -
स्त्री शिक्षणात व इतर समाज कार्यात स्वत: च्या पत्नीला खंबीरपणे ऊभे करणारे महामानव यांचा जन्म दिवस.

११ एप्रिल -
सतीची चाल, केश वपन इत्यादी समाजातील अनिष्ठ चाली-रितींचा नायनाट करणाऱ्या समाजप्रबोधनकार यांचा जन्म दिवस.

११ एप्रिल -
उच्चभ्रु ब्राम्हण संस्कृती ने निर्माण केलेल्या शुद्र-अतिशुद्र या गलिच्छ विचारांचा नाश करून माणसांना माणसात बसवणाऱ्या महा-मानवाचा जन्म दिवस.

११ एप्रिल -
दलितांना पिण्याच्या पाण्यासाठी स्वत: ची विहीर सदैव बहाल करणाऱ्या महा-पुरूषांचा जन्म दिवस.

११ एप्रिल -
बहुजण समाजाला सर्व क्षेत्रापासुन वंचित ठेवणारे खरे दुश्मन शोधुन बहुजण समाजाला सत्याचा मार्ग दाखवणाऱ्या महासंशोधकांचा जन्म दिवस .

|| जय जोती जय क्रांती ||


...महात्मा जोतिबा फुले यांचा जिवनपट:-
इ.स. ११ एप्रिल १८२७ - जन्म.
इ.स. १८३४ ते १८३८ - पंतोजींच्या शाळेत शिक्षण झाले.
इ.स. १८४० - सावित्रीबाईंशी विवाह.
इ.स. १८४१ ते १८४७ - स्कॉटिश मिशन हायस्कूलमध्ये इंग्रजी शिक्षण घेतले.
इ.स. १८४७- लहुजी वस्ताद साळवे दांडपट्टा व इतर शारीरिक शिक्षण घेतले.
इ.स. १८४७ - थॉमस पेन यांच्या 'राईट ऑफ मॅन' या ग्रंथाचा अभ्यास.
इ.स. १८४८ - मित्राच्या विवाहप्रसंगी निघालेल्या मिरवणुकीत उच्चवर्णीयांकडून अपमान झाला.
इ.स. १८४८ - भारतातील मुलींची पहिली शाळा सुरू केली. बहुजन समाजाच्या शिक्षणासाठी काम सुरू केले.
इ.स. १८४९ - वरील कारणांमुळे वडिलांशी मतभेद व गृहत्याग
सप्टेंबर ७, इ.स. १८५१ - भिडे वाड्यात व रास्ता पेठेत मुलींच्या शाळेची सुरुवात.
इ.स. १८५२ - पूना लायब्ररीची स्थापना.
मार्च १५, इ.स. १८५२ - वेताळपेठेत अस्पृश्यांसाठी पहिली शाळा सुरू केली.
नोहेंबर १६, इ.स. १८५२ - मेजर कॅन्डी यांच्याकडून शैक्षणिक कार्यासाठी ब्रिटिश सरकारतर्फे विश्रामबाग वाड्यात सत्कार.
इ.स. १८५३ - 'दि सोसायटी फॉर प्रमोटिंग द एज्युकेशन ऑफ महार मांग ॲन्ड अदर्स' स्थापन केली.
इ.स. १८५४ - स्कॉटिश मिशनच्या शाळेत अर्धवेळ शिक्षकाची नोकरी
इ.स. १८५५ - 'तृतीयरत्न' नाटकाचे लेखन.
इ.स. १८५५ - रात्रशाळेची सुरुवात केली.
इ.स. १८५६ - जोतीबांवर मारेकरी घालून हत्येचा प्रयत्न झाला.
इ.स. १८५८ - शाळांच्या व्यवस्थापन मंडळातून निवृत्ती घेतली.
इ.स. १८६० - विधवा पुनर्विवाहास साहाय्य केले.
इ.स. १८६३ - बालहत्या प्रतिबंधक गृहाची स्थापना केली .
इ.स. १८६५ - विधवांच्या केशवपनाविरुद्ध न्हाव्यांचा संप घडवून आणला.
इ.स. १८६४ - गोखले बागेत विधवाविवाह घडवून आणला.
इ.स. १८६८ - वडील गोविंदराव यांचा मृत्यू
इ.स. १८६८ - दुष्काळ काळात राहत्या घरातील हौद अस्पृश्यांसाठी खुला केला.
इ.स. १८७३ - 'गुलामगिरी' ची लेखन
इ.स. १८७३ - सत्यशोधक समाजची स्थापना केली.
इ.स. १८७५ - शेतकऱ्यांच्या शोषणाविरुद्ध खतफोडीचे बंड घडवून आणले ( अहमदनगर).
इ.स. १८७५- स्वामी दयानंद सरस्वतींची पुण्यात मिरवणूक काढण्यास साहाय्य केले.
इ.स. १८७६ ते १८८२ - पुणे नगर पालिकेचे सदस्य होते.
इ.स. १८८० - दारूची दुकाने सुरू करण्यास विरोध केला.
इ.स. १८८० - नारायण मेघाजी लोखंडे यांना 'मिलहॅण्ड असोसिएशन' या देशातील पहिल्या कामगार संघटनेच्या स्थापनेत साहाय्य केले.
इ.स. १८८२ - 'विल्यम हंटर शिक्षण आयोगा' समोर निवेदन दिले. यात प्राथमिक शिक्षण सक्तीचे व मोफत देण्याची मागणी केली.
इ.स. १८८३ - 'शेतकऱ्याचा आसूड'चे लेखन
इ.स. १८८७ - सत्यशोधक समाजातर्फे नवीन मंगलाष्टकांची व नवीन पूजाविधीची रचना करून पुरोहिताशिवाय विवाह घडवून आणण्यास सुरुवात केली.
इ.स. १८८८- ड्यूक ऑफ कॅनॉट यांची भेट आणि सत्कार.
इ.स. १८८८ - मुंबईतील कोळीवाडा येथे जनतेने रावबहादुर वडेकर यांच्या हस्ते सत्कार करून 'महात्मा' ही पदवी प्रदान केली.
२८ नोव्हेंबर, इ.स. १८९० - पुणे येथे निधन झाले
🏻.जय जोति....🏻

Tuesday, 7 February 2017

🔵👉🏻.. ७ फेब्रुवारी २०१७ माता "रमाई भीमराव आंबेडकर" १२०वी जयंती..👈🏻🔵

🔵👉🏻.. ७ फेब्रुवारी २०१७ माता "रमाई भीमराव आंबेडकर" १२०वी जयंती..👈🏻🔵

७ फेब्रुवारी १८९७ "माता रमाई भीमराव आंबेडकर" जयंती निमित्त "माता रमाईला" माझा कोटी-कोटी प्रणाम..🙏🏻

रमाई म्हणजे कठोर कर्तव्यनिष्ठेचे मुर्तिमंत प्रतिक, तिच्या कर्तव्यकठोर निष्ठेतुनच भारत देशात भारतीय घटनेचे शिल्पकार तसेच कोहिनुर हि-या समान डाॅ. बाबासाहेब आंबेडकरांन सारखा दैदिव्यमान सुर्य या जगास लाभला.

माता "रमाई भीमराव आंबेडकर" यांच्या१२०व्या जयंतीनिमित्त माता रमाईस कोटी-कोटी वंदन..🙏🏻🙏🏻सर्वांना हार्दीक हार्दीक शुभेच्छा...💐💐💐

🙏🏻..जय भीम..🙏🏻
🙏🏻..जय माता रमाई..🙏🏻

Tuesday, 3 January 2017

"स्त्री शिक्षणाची आराध्य दैवत", भारतातील प्रथम शिक्षिका, प्रथम मुख्यध्यापिका, सावित्रीबाई फुले यांचा १८७ व्या जयंती निमित्त विनम्र अभिवादन.....!!!

                        🙏🏻 ३ जानेवारी १८३१ 🙏🏻
ज्यांनी स्त्रियांन बद्दल "चुल आणि मुल" ही भावना  मोडीत काढतं. स्त्री शिक्षणाचा पाया रोवला. स्रियांना सन्मानाचे जीवन मिळवुन दिलं. आज ची स्त्री ही कोणत्याही क्षेत्रांत मागे नाही. स्त्रियांचे जीवन शैली ज्यांनी पुर्ण पणे बदलली अश्या "स्त्री शिक्षणाची आराध्य दैवत", भारतातील प्रथम शिक्षिका, प्रथम मुख्यध्यापिका, सावित्रीबाई फुले यांचा १८७ व्या जयंती निमित्त विनम्र अभिवादन.....!!!

Tuesday, 20 December 2016

*जे चळवळीत भाग घेत नाही ते शेणातले कीडे.*  -- डॉ बाबासाहेब आंबेडकर

*जे चळवळीत भाग घेत नाही ते शेणातले कीडे.*
   __ _डॉ बाबासाहेब आंबेडकर

 जे चळवळीचे कार्य करीत नाही त्यांना बाबासाहेबांनी “शेणातील किडे” असे म्हंटले आहे. ते म्हणतात, समाजात कार्य करणारी माणसे अत्यंत थोडी असतात... बाकीचे
सर्वजण शेनातल्या किड्याप्रमाणे स्वतःच्या आनंदात मग्न असतात.

अशा माणसाला तु शेनातल्या किड्याचे जीवन जगतो आहेस
याची जाणीव करून देणे हे प्रत्येक सुक्षशीताने आपले कर्तव्य समजले पाहिजे. ज्या शिक्षितांवर बाबासाहेबांनी हि जबाबदारी सोपवली तेच सुशिक्षित आज
कोणतेही कार्य न कर्ता शेनातल्या किड्याचे जीवन जगत असतील. तर त्यांच्याकडून काय अपेक्ष करणार?
चळवळ हि महापुरुषांच्या विचार प्रमाणे करवयाची असते लोकांच्या कालाप्रमाणे नव्हे जे अशी चळवळ करतात ते केवळ सवंग प्रसिद्धीसाठी तसे करीत असतात जगात काही माणसे भित्री असतात

माणसाने एकटे जाण्याचे धैर्य केले पाहिजे एकटे जाण्याचे धैर्य
मी करतो हजारो लोक जरी माझ्या मागे नसेलतरी मी त्यांची पर्वा करीत नाही किंवा त्यांची खंतही बाळगत नाही.

बाबासाहेबांची हि भूमिका पाहिली तर ते लोकांपेक्षा भूमिकेला महत्व देत होते हे आपल्या लक्षात येईल.

जय भिम

🙏🙏*विज्ञानवादी गाड़गे बाबा*🙏🙏

🎤🎤🎤🎤🎤🎤🎤🎤🎤🎤🎤

  🙏🙏*विज्ञानवादी गाड़गे बाबा*🙏🙏

एकदा गाडगेबाबा गावातून
जात असताना नदीच्या काठावर
त्यांना काही भटजी पिंडदानाची
पूजा करत असलेले दिसले.
बाबा तिकडे जाउन म्हणाले-

 "भडजीबुवा..भडजी बुवा..
मले लय भूक लागली बाप्पा,
मी हा भात खाऊ का..??"
☆☆☆☆☆☆☆☆☆☆☆☆☆☆☆☆


गाडगेबाबांचा एकंदर वेश
एखाद्या भिकाऱ्या सारखाच..!!
अंगावर असलेल्या कपड्यात
एकसंध कपडा कुठेच नव्हता,
ठिकठिकाणी ठिगळ लाऊन
तयार केलेलं ते नेसले होते.
त्यांचा तो अवतार बघून
भटजी त्वेषाने म्हणाले-

"अरे वेड्या, हा भात नाही,
याला पिंड म्हणतात पिंड..."!
☆☆☆☆☆☆☆☆☆☆☆☆☆☆☆☆☆

"पिंड म्हणजे काय असते बाप्पा..?
गाडगेबाबांनी प्रश्न केला.
☆☆☆☆☆☆☆☆☆☆☆☆☆☆☆☆

"अरे हे जे गृहस्थ दिसतायत ना
त्यांचे वडील मृत्यू पावले आहेत,
ते स्वर्गात गेले आहेत,
त्यांच्यासाठी आम्ही हे पिंड ठेवले आहे...

" बाजूला बसलेल्या डोक्याचा गोटा केलेल्या माणसाकडे बोट दाखवत भटजी म्हणाले.
☆☆☆☆☆☆☆☆☆☆☆☆☆☆☆☆

गाडगेबाबांनी चेहरा प्रश्नार्थक केला, म्हणाले- "त्यायले पिताजी तिकडे स्वर्गात,
भात इथं, त्यायले कसला पोहोचते..??
मले खूप भूक लागली..
मीच खातो तो भात..द्या मले..."
☆☆☆☆☆☆☆☆☆☆☆☆☆☆☆☆

"अरे वेड्या,
त्यासाठीच तर मी मंत्र म्हणतोय ना..??"
भटजी रागाने म्हणाले.


"मंत्र बोलून काय होईल बाप्पा..??
" गाडगेबाबांनी लग्गेच प्रश्न टाकला.


"वेड्या, अरे मंत्र म्हटले कि,
हे पिंड त्यांच्या पिताजींना पोहोचणार,
तिकडे स्वर्गात, आणि ते संतुष्ट होणार..
" भटजी बाबांना टाळण्यासाठी बोलला.


"माह्या बाप्पा, काय म्हणता भडजीबुवा..??
मंत्र बोलला कि, भात असा सर्गात जाऊन पोहोचते..??
पण सरग तर लय दूर असेल ना..??
गाडगेबाबा म्हणाले.


"होय रे वेड्या स्वर्ग खूप दूर आहे इथून..
" इति भटजी.


"मबई इतका दूर..??
गाडगेबाबांनी लग्गेच प्रश्न केला.


"अरे हो रे वेड्या, मुंबई काय घेऊन बसलास..??  इथून लाखो-करोडो मैल दूर आहे स्वर्ग..
" भटजी अत्यंत त्रासिकपणे म्हणाले.

"माह्या बाप्पा.. काय म्हणते हे भडजीबुवा..
" असं स्वतःशीच बडबडत गाडगेबाबा नदीच्या पाण्यात उतरले..
चांगल्या कंबरेभर पाण्यात गेल्यावर दोन्ही हात वर आकाशाकडे करून ते जोरात म्हणाले-
"मह्या बाप्पा, बाप्पा..
ह्यायने मंत्र म्हटला कि, ह्यायचा भात तिकडे दूर स्वर्गात जाते रे...
" असं म्हणत त्यांना काय वाटले कोण जाणे..??
 त्यांनी दोन्ही हातांनी भर-भरून पाणी
जोरात हवेत उडवायला सुरुवात केली.
काठावर पूजेसाठी बसलेली माणसं,
भटजी सगळे भिजून गेले. सगळे चिडले बाबांवर.
भट रागाने म्हणाला-
"अरे ए वेड्या, तुला वेड लागले काय रे..??
अरे मुर्खासारखा पाणी काय उडवतोस
आमच्या अंगावर...??"



बाबा त्यांच्याकडे बघून हसले आणि म्हणाले-
"बाप्पा मी, नाय पाणी उडवत..??

"मग काय करतोयस तू हे..??"
भट रागाने म्हणाला.

 "माह्या बाप्पा, मी माझ्या शेताले पाणी देऊन ऱ्हायलो..."



"अरे वेड्या, कुठे आहे तुझं शेत इथे..??"
त्रासिक भट.

"ते तिकडे अमरावतीला हाव..
मी त्यालेच पाणी देऊन ऱ्हायलो ना बाप्पा.." गाडगेबाबा पाणी उडवत शांतपणे म्हणाले.

"हाहाहा..
अरे वेड्या तू उडवलेले पाणी फार फार तर फर्लांगभर जाईल रे..
अमरावती इथून ४०० मैल दूर आहे, तिकडे कसे जाईल?
एवढे साधे कळत नाही तुला..
वेडा रे वेडा..."
भट कुत्सितपणे हसत म्हणाला.


गाडगेबाबा तितक्याच शांतपणे म्हणाले-
"तुह्या मंत्राने जर हा भात लाखो-करोडो मैल दूर सर्गात जात असेल तर माह्य पानी बी माझ्या शेताले पोचायला हवं ना रे बाप्पा...?"

भट निरुत्तर झाला.

अंगावर चिंध्या पांघरलेल्या वेडगळ दिसणाऱ्या मनुष्याने आज तिथे आपल्या वागण्यातून खूप मोठा संदेश लोकांना दिला होता. एकही इयत्ता न शिकलेल्या गाडगेबाबांना जी गोष्ट कळाली होती ती गोष्ट आज "डिग्र्यांनी" भरलेल्या फाईल्स घेऊन फिरणाऱ्या तुमच्या आमच्या सुशिक्षितांना कळत नाही या पेक्षा मोठे दुर्दैव आणि मानसिक गुलामगिरी ती आणखी काय असावी..??

जेव्हा आज-सारखी नियतकालिके, साप्ताहिके, मासिके किंवा प्रिंट मिडिया नव्हता तेव्हा समाज प्रबोधनाचं अत्यंत जिकरीचं काम महाराष्ट्रात संतांनी लोकांना समजेल अशा भाषेत प्रभावीपणे केले हे आजही त्यांना 'टाळ-कुटे देवभोळे' मानणाऱ्या तथाकथित पुरोगामी महाराष्ट्रीयांना माहित नाही, हे महाराष्ट्राच्या पुरोगामित्वाचे दुर्दैव म्हणावे लागेल..!!