Monday, 31 December 2018
⛩ कामठी परिषद 👩👩👧👧👨👩👦👦 ( मे १९३० कामठी, नागपूर परिषदेमधील एक प्रसंग)
⛩ कामठी परिषद 👩👩👧👧👨👩👦👦
( मे १९३० कामठी, नागपूर परिषदेमधील एक प्रसंग)
परिषदेच्या पहिल्या दिवशी जेवणाच्या पंगती सकाळी अकरा वाजल्यापासून दुपारी दोन वाजेपर्यंत बसत होत्या, दुपारचे दोन वाजले होते. बाबासाहेबांनी मला विचारले, 'अरे तुम्ही जेवलात का?' मी त्यांना सांगितले, 'अजून आमचे जेवण झालेले नाही. आम्ही आता कुठून तरी जेवण करुन येतो.' असे म्हणताच बाबासाहेब एकदम माझ्यावर रागवले. (प्रेममूलक राग) ते म्हणाले, "इतके हजारो लोक येथे जेवत असताना तुम्ही देखील तेथे जाऊन जेवायला काय होते?" मी बाबासाहेबांना सांगितले, "बाहेरून आलेल्या खेड्यातील लोकांची येथे बरीच गर्दी झालेली असल्याने त्यांची प्रथमतः सोय होणे अत्यंत महत्वाचे आहे. या दृष्टीने आम्ही थोडीशी हयगय केली."
बाबासाहेबांनी ताबडतोब श्री.शिवतरकर व मडकेबुवा यांना बोलावून घेतले व त्यांना म्हणाले, "तुम्ही लोकं स्वतःपुरतेच बघता. तुमच्याबरोबर आलेल्या इतर मंडळीची देखील विचारपूस करणे हे तुमचे काम नाही का?" असे म्हणून आमच्याकडे ते निर्देश करुन म्हणाले, "वराळे व होंगल हे कर्नाटकातून आले आहेत. येथे त्यांची विशेष कोणाशी ओळखपाळख नाही. ते अजूनही जेवले नाहीत. तेव्हा ताबडतोब त्यांच्या जेवणाची व्यवस्था झाली पाहिजे." असे म्हणून त्यांनी आपल्या खिशातील दहा रुपयांची नोट काढून श्री.मडकेबुवा यांच्याकडे दिली व ताबडतोब बटाटे, वांगी, डाळ, तांदूळ वगैरे आणावयास लावले व जवळच एका राहुटीमध्ये स्वतःच्या देखरेखीखाली मडकेबुवांच्याकडून स्वयंपाक करविला. नंतर आम्हांला व इतर जे जेवायचे राहिले होते त्या सर्वांना बोलावून बाबासाहेबांनी जेवायला लावले. नंतर मग ते परिषदेच्या कामात गुंतले. कोठेही आणि केव्हाही बाबासाहेबांचे लक्ष लहान थोर कार्यकर्त्यांकडे असायचे. हा अत्यंत दुर्मिळ गुण बाबासाहेबांच्यात होता. पुढाऱ्यांच्या ठिकाणी असा गुण क्वचितच आढळतो.
डाॅ.आंबेडकरांचा सांगाती या पुस्तकातून
( मे १९३० कामठी, नागपूर परिषदेमधील एक प्रसंग)
परिषदेच्या पहिल्या दिवशी जेवणाच्या पंगती सकाळी अकरा वाजल्यापासून दुपारी दोन वाजेपर्यंत बसत होत्या, दुपारचे दोन वाजले होते. बाबासाहेबांनी मला विचारले, 'अरे तुम्ही जेवलात का?' मी त्यांना सांगितले, 'अजून आमचे जेवण झालेले नाही. आम्ही आता कुठून तरी जेवण करुन येतो.' असे म्हणताच बाबासाहेब एकदम माझ्यावर रागवले. (प्रेममूलक राग) ते म्हणाले, "इतके हजारो लोक येथे जेवत असताना तुम्ही देखील तेथे जाऊन जेवायला काय होते?" मी बाबासाहेबांना सांगितले, "बाहेरून आलेल्या खेड्यातील लोकांची येथे बरीच गर्दी झालेली असल्याने त्यांची प्रथमतः सोय होणे अत्यंत महत्वाचे आहे. या दृष्टीने आम्ही थोडीशी हयगय केली."
बाबासाहेबांनी ताबडतोब श्री.शिवतरकर व मडकेबुवा यांना बोलावून घेतले व त्यांना म्हणाले, "तुम्ही लोकं स्वतःपुरतेच बघता. तुमच्याबरोबर आलेल्या इतर मंडळीची देखील विचारपूस करणे हे तुमचे काम नाही का?" असे म्हणून आमच्याकडे ते निर्देश करुन म्हणाले, "वराळे व होंगल हे कर्नाटकातून आले आहेत. येथे त्यांची विशेष कोणाशी ओळखपाळख नाही. ते अजूनही जेवले नाहीत. तेव्हा ताबडतोब त्यांच्या जेवणाची व्यवस्था झाली पाहिजे." असे म्हणून त्यांनी आपल्या खिशातील दहा रुपयांची नोट काढून श्री.मडकेबुवा यांच्याकडे दिली व ताबडतोब बटाटे, वांगी, डाळ, तांदूळ वगैरे आणावयास लावले व जवळच एका राहुटीमध्ये स्वतःच्या देखरेखीखाली मडकेबुवांच्याकडून स्वयंपाक करविला. नंतर आम्हांला व इतर जे जेवायचे राहिले होते त्या सर्वांना बोलावून बाबासाहेबांनी जेवायला लावले. नंतर मग ते परिषदेच्या कामात गुंतले. कोठेही आणि केव्हाही बाबासाहेबांचे लक्ष लहान थोर कार्यकर्त्यांकडे असायचे. हा अत्यंत दुर्मिळ गुण बाबासाहेबांच्यात होता. पुढाऱ्यांच्या ठिकाणी असा गुण क्वचितच आढळतो.
डाॅ.आंबेडकरांचा सांगाती या पुस्तकातून
सर्वांसाठी_बाबासाहेब
१९३७ साली मुंबई विधानसभेवर काँग्रेसला बहुमत मिळाल्याने त्यांचे मंत्रिमंडळ बनविण्यात आले. ना.बाळासाहेब खेर हे त्यावेळी मुख्यमंत्री होते. मुस्लिम लीगचे सदस्य आमच्यापेक्षा अधिक होते. लीगनंतरचा मोठा विरोधी पक्ष म्हणजे आमचाच होता. (स्वतंत्र मजूर पक्ष) विरोधी पक्षात त्यावेळी जमनादास मेथा यांच्यासारखे प्रभावी वक्ते असल्यामुळे विरोधी सत्तांचा सत्तारूढ सरकारवर फार दबाव होता. डाॅ.बाबासाहेब आंबेडकर, सर देहलवी व जमनादास मेथा हे बोलायला उठले म्हणजे सगळे सभागृह एकदम शांत व्हायचे. सत्तारूढ काँग्रेस पक्षातील सदस्य त्यावेळी कावरेबावरे व्हायचे.
बाबासाहेबांचे भाषण मुद्देसूद, प्रमाणबद्ध, प्रभावी व परिणामकारक असे व्हायचे. ते अंत:करणाला जाऊन भिडायचे. पुरावे आणि आकडेवारी यांच्या साहाय्याने प्रतिपक्षालाही आपले म्हणणे पटवून द्यायचे. सरकारी बाकावरील काहीतरी थातूरमातूर आणि जुजबी स्वरूपाची उत्तरे देत. त्यावेळी विरोधी पक्षांतून त्यांची हुर्रे करण्यात येत असे. बाबासाहेबांचे भाषण असलेल्या दिवशी सभागृह भरगच्च भरलेले असायचे. प्रेक्षकांच्या गॅलरीतही गर्दी व्हायची. बाबासाहेबांचे प्रतिपादन केवळ विरोधासाठी विरोध अशा प्रकारचे नव्हते. तात्विक निकषांवर ते विवेचन करायचे. तत्वतः बाबासाहेबांचे विवेचन मान्य आहे अशा प्रकारची कबुली त्यावेळचे मुख्यमंत्री ना.बाळासाहेब खेर अनेकदा देत असत. मुख्यमंत्री श्री.खेर यांच्या मनात बाबासाहेबांच्याबद्दल एक प्रकारची आदराची भावना वसत होती.
डाॅ.आंबेडकरांचा सांगाती या पुस्तकातून
#सर्वांसाठी_बाबासाहेब
बाबासाहेबांचे भाषण मुद्देसूद, प्रमाणबद्ध, प्रभावी व परिणामकारक असे व्हायचे. ते अंत:करणाला जाऊन भिडायचे. पुरावे आणि आकडेवारी यांच्या साहाय्याने प्रतिपक्षालाही आपले म्हणणे पटवून द्यायचे. सरकारी बाकावरील काहीतरी थातूरमातूर आणि जुजबी स्वरूपाची उत्तरे देत. त्यावेळी विरोधी पक्षांतून त्यांची हुर्रे करण्यात येत असे. बाबासाहेबांचे भाषण असलेल्या दिवशी सभागृह भरगच्च भरलेले असायचे. प्रेक्षकांच्या गॅलरीतही गर्दी व्हायची. बाबासाहेबांचे प्रतिपादन केवळ विरोधासाठी विरोध अशा प्रकारचे नव्हते. तात्विक निकषांवर ते विवेचन करायचे. तत्वतः बाबासाहेबांचे विवेचन मान्य आहे अशा प्रकारची कबुली त्यावेळचे मुख्यमंत्री ना.बाळासाहेब खेर अनेकदा देत असत. मुख्यमंत्री श्री.खेर यांच्या मनात बाबासाहेबांच्याबद्दल एक प्रकारची आदराची भावना वसत होती.
डाॅ.आंबेडकरांचा सांगाती या पुस्तकातून
#सर्वांसाठी_बाबासाहेब
📚📖✒ शिक्षण आणि कायदा 🎓
डाॅ.आंबेडकरांचा अग्रक्रम नेहमीच शिक्षण आणि कायदा या क्षेत्रांना होता. आपल्या संस्था आणि महाविद्यालये त्यांनी नेहमीच राजकारणापेक्षा महत्वाची मानली होती. कारण त्यांच्या हे लक्षात आले होते की जनतेला उदारमतवादी शिक्षण मिळाल्याखेरीज त्यांची परिस्थिती सुधारण्याची सुतराम शक्यता नाही आणि आता डाॅ.आंबेडकरांचा वारसा पुढे चालविण्याची जबाबदारी त्या संस्थावरच आहे. वकिलांबद्दल त्यांना नेहमीच जिव्हाळा होता आणि त्यामुळे त्यांच्या सहकाऱ्यांमध्ये वकिलांचा भरणा मोठा होता. हुकूमशाही आणि नायकपूजा या दोन संकटांनी घेतलेल्या या देशातील लोकशाहीचे अस्तित्व अबाधित राहायचे तर वकिलांचा स्वतंत्र वर्ग जोपासला जाणे अत्यावश्यक आहे असा त्यांचा दृढ विश्वास होता.
प्रा.हेलेकर
डाॅ.बाबासाहेब आंबेडकर: अनुभव आणि आठवणी या पुस्तकातून
प्रा.हेलेकर
डाॅ.बाबासाहेब आंबेडकर: अनुभव आणि आठवणी या पुस्तकातून
💥 *वंदे मातरम् काराचे झणझणीत अंजन*
*वंदे मातरम् काराचे झणझणीत अंजन*
'वंदे मातरम्' कार बंकिमचंद्र चटर्जी यांचा एका लेखातील एक खळबळजनक उतारा *जनतेत* (जनता वृत्तपत्र, २२ फेब्रुवारी १९२९) आढळतो.
बकिमचंद्रांनी स्पष्ट शब्दांत सांगितले की, *मूठभर ब्राम्हण-क्षत्रियांनी बहुजन समाजावर अन्यायकारक पद्धतीने राज्य केले.* जसा विदेशी ब्रिटिशांनी भारतीयात भेदभाव केला तसेच स्वदेशी ब्राम्हणांनी बहुसंख्य भारतीयांशी भेदभावाचे धोरण ठेवले. *इंग्रजशाही आणि ब्राम्हणशाहीची* तुलना करताना बकिमचंद्र लिहितात;
"काही लोक म्हणतील की इंग्रजांच्या प्राधान्यात आणि ब्राम्हण क्षत्रियांच्या वरचढपणात मोठा फरक आहे. ब्राम्हण कितीही झाले तरी स्वदेशीय होते व आहेत. इंग्रज बोलून चालून परकीय! यास आमचे असे उत्तर आहे की, *स्वदेश बांधवांपासून होणाऱ्या पीडेत व अन्यायात काही फरक अाहे का?* एकाच्या हातून होणारी पीडा कडू असते आणि दुसऱ्याच्या हातून होणारा त्रास गोड तर नसतो ना? *त्रास तो त्रास. पीडा ती पीडा.* कदाचित काही लोकांस परकीय लोकांकडून होणारा त्रास स्वकीयांपासून झालेल्या त्रासापेक्षा बरा वाटत असेल. त्यांच्याशी आम्हांस काही कर्तव्य नाही. आम्ही एवढेच म्हणतो की, *बहुसंख्यांक भारतीयांच्या दृष्टीने इंग्रजशाहीत होणाऱ्या त्रासापेक्षा ब्राम्हणशाहीत झालेला व होणारा त्रास आणि अधिक अपमान आहे.*
हिंदी लोकांची *इंग्रज नोकरशाही* विरुध्द एक जोराची तक्रार असते. ती ही की लायक हिंदी मनुष्य असला तरी त्याला जबाबदारीच्या उच्च नोकऱ्या मिळत नाहीत. हिंदी लोकांस आपल्या गुणांचा विकास करावयास संधी किंवा अवसर मिळत नाही. त्यास *Equality of Opportunity (समान संधी)* मिळत नाही. परंतु ही तक्रार करणाऱ्यांनी हिंदुस्थानच्या मागील इतिहासाकडे दृष्टी फेकली तर त्यास आढळून येईल की, *त्यांच्या ब्राम्हण क्षत्रिय पूर्वजांनी इंग्रज नोकरशाहीपेक्षाही कमालीचा मोठा अन्याय शूद्रवर्गात ढकलेल्या, मागासलेल्या व अस्पृश्य वर्गाच्या बाबतीत केलेला आहे.* इंग्रजांनी आमच्या काही गोष्टी हिरावून नेल्या असल्या तरी त्यांनी आम्हांस पाश्चात्य साहित्य व विज्ञान याचे ज्ञान दिलेले आहे. बहुसंख्याक शूद्र ठरविलेल्या जनतेस आमच्या पूर्वजांनी मोबदल्यात काहीच दिले नाही. ब्राम्हण व त्याच्या खालोखाल क्षत्रियांना सौख्य व अधिकार होते. परंतु प्रचंड लोकसमूहाची स्थिती हल्ली आहे तशीच होती. काही इतिहासाचे मते ती हल्लीपेक्षाही निकृष्ट होती. खालच्या लोकांस काही अधिकार नसत. त्यांच्या करिता निराळे कायदे असत. त्यांच्यावर होणाऱ्या अन्यायाची फिर्याद नसे. एवंच त्यांस *सर्वस्वी अन्यायाच्या व दुःखाच्या गर्तेत लोटून दिलेले होते."*
'वंदे मातरम्' च्या आडून मुस्लिमांवर तिरंदाजी करणाऱ्या *राष्ट्रीय स्वयंसेवक संघ-भाजपाच्या नेत्यांच्या* डोळ्यात बकिमचंद्रांचे हे *झणझणीत अंजन* अजूनपर्यंत कोणी घातले नसावे. अन्यथा 'वंदे मातरम्' च्या नावाखाली अष्टभूजाधारी देवीची पूजा अर्चना करण्याचे सोंग उभे करावयाचे, अन्य धर्मियांना *भडकावयाचे* पण भारताची बहुसंख्यांक जनता - खरी भारतमाता यांना मात्र *गुलामीत* ठेवण्याच्या *षडयंत्रांना* कुठे तरी गवसणी घातली गेली असती......
बकिमचंद्रांनी स्पष्ट शब्दांत सांगितले की, *मूठभर ब्राम्हण-क्षत्रियांनी बहुजन समाजावर अन्यायकारक पद्धतीने राज्य केले.* जसा विदेशी ब्रिटिशांनी भारतीयात भेदभाव केला तसेच स्वदेशी ब्राम्हणांनी बहुसंख्य भारतीयांशी भेदभावाचे धोरण ठेवले. *इंग्रजशाही आणि ब्राम्हणशाहीची* तुलना करताना बकिमचंद्र लिहितात;
"काही लोक म्हणतील की इंग्रजांच्या प्राधान्यात आणि ब्राम्हण क्षत्रियांच्या वरचढपणात मोठा फरक आहे. ब्राम्हण कितीही झाले तरी स्वदेशीय होते व आहेत. इंग्रज बोलून चालून परकीय! यास आमचे असे उत्तर आहे की, *स्वदेश बांधवांपासून होणाऱ्या पीडेत व अन्यायात काही फरक अाहे का?* एकाच्या हातून होणारी पीडा कडू असते आणि दुसऱ्याच्या हातून होणारा त्रास गोड तर नसतो ना? *त्रास तो त्रास. पीडा ती पीडा.* कदाचित काही लोकांस परकीय लोकांकडून होणारा त्रास स्वकीयांपासून झालेल्या त्रासापेक्षा बरा वाटत असेल. त्यांच्याशी आम्हांस काही कर्तव्य नाही. आम्ही एवढेच म्हणतो की, *बहुसंख्यांक भारतीयांच्या दृष्टीने इंग्रजशाहीत होणाऱ्या त्रासापेक्षा ब्राम्हणशाहीत झालेला व होणारा त्रास आणि अधिक अपमान आहे.*
हिंदी लोकांची *इंग्रज नोकरशाही* विरुध्द एक जोराची तक्रार असते. ती ही की लायक हिंदी मनुष्य असला तरी त्याला जबाबदारीच्या उच्च नोकऱ्या मिळत नाहीत. हिंदी लोकांस आपल्या गुणांचा विकास करावयास संधी किंवा अवसर मिळत नाही. त्यास *Equality of Opportunity (समान संधी)* मिळत नाही. परंतु ही तक्रार करणाऱ्यांनी हिंदुस्थानच्या मागील इतिहासाकडे दृष्टी फेकली तर त्यास आढळून येईल की, *त्यांच्या ब्राम्हण क्षत्रिय पूर्वजांनी इंग्रज नोकरशाहीपेक्षाही कमालीचा मोठा अन्याय शूद्रवर्गात ढकलेल्या, मागासलेल्या व अस्पृश्य वर्गाच्या बाबतीत केलेला आहे.* इंग्रजांनी आमच्या काही गोष्टी हिरावून नेल्या असल्या तरी त्यांनी आम्हांस पाश्चात्य साहित्य व विज्ञान याचे ज्ञान दिलेले आहे. बहुसंख्याक शूद्र ठरविलेल्या जनतेस आमच्या पूर्वजांनी मोबदल्यात काहीच दिले नाही. ब्राम्हण व त्याच्या खालोखाल क्षत्रियांना सौख्य व अधिकार होते. परंतु प्रचंड लोकसमूहाची स्थिती हल्ली आहे तशीच होती. काही इतिहासाचे मते ती हल्लीपेक्षाही निकृष्ट होती. खालच्या लोकांस काही अधिकार नसत. त्यांच्या करिता निराळे कायदे असत. त्यांच्यावर होणाऱ्या अन्यायाची फिर्याद नसे. एवंच त्यांस *सर्वस्वी अन्यायाच्या व दुःखाच्या गर्तेत लोटून दिलेले होते."*
'वंदे मातरम्' च्या आडून मुस्लिमांवर तिरंदाजी करणाऱ्या *राष्ट्रीय स्वयंसेवक संघ-भाजपाच्या नेत्यांच्या* डोळ्यात बकिमचंद्रांचे हे *झणझणीत अंजन* अजूनपर्यंत कोणी घातले नसावे. अन्यथा 'वंदे मातरम्' च्या नावाखाली अष्टभूजाधारी देवीची पूजा अर्चना करण्याचे सोंग उभे करावयाचे, अन्य धर्मियांना *भडकावयाचे* पण भारताची बहुसंख्यांक जनता - खरी भारतमाता यांना मात्र *गुलामीत* ठेवण्याच्या *षडयंत्रांना* कुठे तरी गवसणी घातली गेली असती......
📚 *शिक्षण* 📖✒
*शिक्षण* ✒
*शिक्षण घेण्याच्या काळात तरूणांनी आपले संपूर्ण लक्ष अभ्यासावरच केंद्रित करणे अत्यंत गरजेचे आहे. यातूनच त्यांच्या ठिकाणी हाती घेतलेल्या प्रत्येक कामाबद्दल निष्ठा बाळगण्याची सवय वाढीला लागू शकते. तसे ते जीवनाच्या इतर क्षेत्रांत तसेच देशाच्याही इतर घडामोडीत रस घेऊ शकतात. पण जेव्हा त्यांनी स्वतःच्या शिक्षणाचे कर्तव्य अंगावर घेतेलेले असते तेव्हा त्यांची मुख्य निष्ठा ही अभ्यासावरच केंद्रित झाली पाहिजे. मागास जातीच्या प्रत्येक कुटुंबाने आपल्या मुलांना शिकविण्याचा जास्तीतजास्त प्रयत्न केला पाहिजे. त्यातून ते समाजाचा दर्जा उंचावू शकतील. डाॅ.आंबेडकर हे ज्ञानाचे आणि ग्रंथाचे निष्ठावंत उपासक होते. या निष्ठेमुळेच ते विद्वान आणि महापंडित होऊ शकले. तरूणांनी त्यांचे उदाहरण समोर ठेवून त्याप्रमाणे वागावे.*
*न्यायमूर्ती आर.आर.भोळे*
*सर्वांसाठी_आंबेडकर*
Sunday, 30 December 2018
चंद्रशेखर आझाद यांनी पुण्यातील आंबेडकर पुतळ्याला केलं अभिवादन

पुणे : मुंबईवरून पुण्याकडे निघालेल्या चंद्रशेखर आझाद यांनी पुण्यात आल्यानंतर प्रथम त्यांनी शिवाजीनगर येथील शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला अभिवादन केले, त्यानंतर पुणे स्टेशन येथील आंबेडकर पुतळ्याला अभिवादन केले. यावेळी मोठ्या प्रमाणावर भीम आर्मीचे कार्यकर्ते उपस्थित होते. चंद्रशेखर तुम आगे बढो हम तुम्हारे साथ हेंच्या घोषणा यावेळी देण्यात आल्या.
चंद्रशेखर आझाद हे मुंबईतील वरळीमध्ये सभा घेणार होते. परंतु पोलिसांनी त्यांच्या सभेला परवानगी नाकारली. तसेच ते ज्या हॉटेलमध्ये थांबले होते, त्या हॉटेलच्या पाचशे मीटर अंतरावर जमावबंदी लागू करण्यात आली होती. सरकारने आपल्याला नजरकैदेत ठेवले असल्याचा आरोप आझाद यांनी केला होता. आज संध्याकाळी पुण्यातील एसएसपीएमएसच्या मैदानावर त्यांची सभा होणार होती, त्याची तयारी सुद्धा करण्यात आली होती. परंतु पोलिसांनी या सभेला परवानगी नाकारल्याने त्यांची सभा रद्द करण्यात आली.
तसेच उद्या ते सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात सभा घेणार होते. त्या सभेला देखील विद्यापीठाने परवानगी नाकारली आहे. आझाद यांना मुंबईतून उत्तर प्रदेशला पाठविण्यात येईल, असे सांगितले जात होते. परंतु दुपारी 1.30 च्या सुमारास आझाद हे मुंबईवरून पुण्याला येण्यासाठी निघाले. रात्री 9.30 च्या सुमारास पुणे स्टेशन येथील आंबेडकर पुतळ्याजवळ ते दाखल झाले. दरम्यान,आझाद हे आज पुण्यात थांबून 1 तारखेला कोरेगाव भीमा येथे जाण्याची शक्यता आहे.
चंद्रशेखर आझाद हे मुंबईतील वरळीमध्ये सभा घेणार होते. परंतु पोलिसांनी त्यांच्या सभेला परवानगी नाकारली. तसेच ते ज्या हॉटेलमध्ये थांबले होते, त्या हॉटेलच्या पाचशे मीटर अंतरावर जमावबंदी लागू करण्यात आली होती. सरकारने आपल्याला नजरकैदेत ठेवले असल्याचा आरोप आझाद यांनी केला होता. आज संध्याकाळी पुण्यातील एसएसपीएमएसच्या मैदानावर त्यांची सभा होणार होती, त्याची तयारी सुद्धा करण्यात आली होती. परंतु पोलिसांनी या सभेला परवानगी नाकारल्याने त्यांची सभा रद्द करण्यात आली.
तसेच उद्या ते सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात सभा घेणार होते. त्या सभेला देखील विद्यापीठाने परवानगी नाकारली आहे. आझाद यांना मुंबईतून उत्तर प्रदेशला पाठविण्यात येईल, असे सांगितले जात होते. परंतु दुपारी 1.30 च्या सुमारास आझाद हे मुंबईवरून पुण्याला येण्यासाठी निघाले. रात्री 9.30 च्या सुमारास पुणे स्टेशन येथील आंबेडकर पुतळ्याजवळ ते दाखल झाले. दरम्यान,आझाद हे आज पुण्यात थांबून 1 तारखेला कोरेगाव भीमा येथे जाण्याची शक्यता आहे.
‘त्यांनी माझं घर जाळलं, पण मी कोरेगाव-भीमाला जाणारच’
कोरेगाव-भीमा येथील विजय स्तंभास गतवर्षी १ जानेवारी २०१८ रोजी २०० वर्षे पूर्ण होणार असल्याने दरवर्षीपेक्षा त्यावेळी तिथे येणार्या नागरिकांच्या संख्येत दुप्पट वाढ झाली होती. दुर्दैवाने त्याच दिवशी कोरेगाव-भीमा येथे झालेल्या दंगलीत अनेक नागरिकांचे आयुष्य बेचिराख झाले. काही जणांना आजही तो दिवस आठवला तरी सुन्न होते. याच कोरेगाव-भीमा पासून काही अंतरावर सणसवाडी हे गाव आहे. येथे राहणार्या रमा अशोक आठवले यांच्या संपूर्ण कुटुंबाला या दंगलीचा फटका बसला आहे.
या घटनेबाबत रमा आठवले यांच्याशी संवाद साधला असता. त्या म्हणाल्या की, कोरेगाव-भीमा येथून काही किमी अंतरावर सणसवाडी या गावात मी मागील २० वर्षांपासून पती आणि तीन मुलांसमवेत राहत होते. माझ्या तिनही मुलांचे बालपण आणि शिक्षण तिथेच झाले. गावातील सर्व लोकांशी आम्ही मिळूनमिसळून राहत होतो. कधी कोणाशी वाद केला नाही.
पती अशोक यांचा वेल्डिंगचा व्यवसाय होता. त्यातून काही बचत करून दरवर्षी कोरेगाव-भीमा येथे येणार्या नागरिकांसाठी अन्नदान करीत असत. गतवर्षी देखील नेहमीप्रमाणे सकाळपासून अन्नदान करण्यास सुरुवात झाली. साधारण दहा वाजण्याच्या सुमारास एका जमावाने आम्हा सर्वांना मारहाण केली. त्यात मी बेशुद्ध झाले. माझे पती अशोक यांना बेदम मारहाण करण्यात आली. जमावाने घर आणि दुकान पेटवले. एवढ्या संख्येने आलेल्या लोकांना आम्ही रोखू शकलो नाही. घर जळत असताना पाहण्याशिवाय आमच्याकडे काहीच नव्हते. आज तो प्रसंग आठवले तरी सुन्न होते. आमचा नेमका गुन्हा तरी काय, असा सवाल त्यांनी उपस्थित केला. या आठवणी सांगताना त्यांना अश्रू अनावर झाले होते.

त्या पुढे म्हणाल्या की, आम्ही आणखी काही काळ गावामध्ये थांबलो असतो. तर आमचे काही खरे नव्हते. तेथून आम्ही पिंपरी येथे काही दिवस राहिलो. त्यानंतर प्रशासनाकडे पाठपुरावा केल्यानंतर नुकसान भरपाई मिळाली असून पुणे महानगरपालिकेच्या कसबा पेठेतील वसाहतीमध्ये काही काळापुरते पुनर्वसन करण्यात आले आहे. त्यामुळे काही दिवसासाठी तरी राहण्यास मिळाले आहे.
आता १ जानेवारीला पुन्हा आम्ही सर्व कुटुंबीय कोरेगाव-भीमा येथे अभिवादन करण्यास जाणार असल्याचे सांगत सणसवाडी येथे अन्नदान करण्यास स्टॉल उपलब्ध करून दिला नसल्याची खंतही त्यांनी व्यक्त केली. मात्र कोणत्याही परिस्थिती आम्ही १ तारखेला कोरेगाव-भीमा येथे अभिवादन आणि अन्नदान असल्याचे त्यांनी सांगितले.
Original source:: https://www.loksatta.com/pune-news/koregaon-bhima-riot-rama-ashok-athavale-vijay-sthamb-pune-1814584/
नजरकैदेचा निषेध | नजरकैद केल्यानं गैरसमज वाढेल-प्रकाश आंबेडकर यांची प्रतिक्रिया-TV9
वंचित माळी समाज राजकीय एल्गार मधील प्रकाश आंबेडकर यांचं मार्गदर्शनीय भाषण (Full Speech)
आम्ही पण येतोय तुम्ही पण या लघुपट Short Film
चंद्रशेखर आझाद रावण मुंबई मध्ये नजर कैदेत ठेवण्याचं कारणच काय - प्रकाश आंबेडकर
कोरेगाव भीमा LIVE | विजय स्तंभ परिसरात कटेकोट बंदोबस्त, समता दलाच्या सैनिकांनाही प्रशिक्षण-TV9
चंद्रशेखर आझाद पुण्याकडे रवाना ; पुण्यात पाेलिसांचा माेठा बंदाेबस्त
पुणे : भीम आर्मीचे प्रमुख चंद्रशेखर आझाद यांना मुंबईतील मनाली हाॅटेलमध्ये नजरकैदेत ठेवण्यात आले हाेते. पाेलीस त्यांना विमानाने उत्तरप्रदेशला पाठविणार अशी चर्चा सुरु असताना आता आझाद पुण्याकडे येत आहेत. दरम्यान पुण्यात कुठलाही अनुचित प्रकार घडू नये यासाठी माेठा पाेलीस बंदाेबस्त आझाद ज्या ठिकाणी सभा घेणार हाेते तेथे आणि ते ज्या हाॅटेलमध्ये उतरणार आहेत तेथे तैनात करण्यात आला आहे.
चंद्रशेखर आझाद हे मुंबईतील वरळीमध्ये सभा घेणार हाेते. परंतु पाेलिसांनी त्यांच्या सभेला परवानगी नाकारली. तसेच ते ज्या हाॅटेलमध्ये थांबले हाेते, त्या हाॅटेलच्या पाचशे मीटर अंतरावर जमावबंदी लागू करण्यात आली हाेती. सरकारने आपल्याला नजरकैदेत ठेवले असल्याचा आराेप आझाद यांनी केला हाेता. आज संध्याकाळी पुण्यातील एस एस पी एम एस च्या मैदानावर त्यांची सभा हाेणार हाेती, त्याची तयारी सुद्धा करण्यात आली हाेती. परंतु पाेलिसांनी या सभेला परवानगी नाकारल्याने त्यांची सभा रद्द करण्यात आली. तसेच उद्या ते सावित्रीबाई फुले पुणेविद्यापीठात सभा घेणार हाेते. त्या सभेला देखील विद्यापीठाने परवानगी नाकारली आहे. आझाद यांना मुंबईतून उत्तरप्रदेशला पाठविण्यात येईल असे सांगितले जात हाेते. परंतु आझाद यांनी पुण्याला जाणारच असा निर्धार केला हाेता. त्याप्रमाणे आता ते पुण्याकडे येण्यास रवाना झाले आहेत.
दरम्यान आझाद यांची सभा हाेणार हाेती त्या एस एस पी एम एस मैदानावर पाेलिसांनी माेठा बंदाेबस्त तैनात केला आहे. त्याचबराेबर कॅम्प भागातील सागर पॅलेस या हाॅटेल बाहेर देखील पाेलीस तैनात करण्यात आले आहे. पुणे पाेलिसांनी आझाद यांना पुण्यात येण्यापासून अडवणार नाही परंतु त्यांना सभा घेण्यास परवानगी देणार नसल्याचे म्हंटले आहे. संध्याकाळी 7 वाजेपर्यंत आझाद पुण्यात पाेहचण्याची शक्यता आहे.
Original source from http://www.lokmat.com/pune/chandrashekhar-azad-leaves-pune-huge-police-deployed-pune/
चंद्रशेखर आझाद यांची नजरकैदेतून सुटका, भीमा-कोरेगाव येथे जाणार
मुंबई - भीम आर्मीचे प्रमुख चंद्रशेखर आझाद यांनी नजर कैदेतून सुटका करण्यात आली आहे. आझाद यांना मालाड येथील हॉटेल मनाली येथे गेल्या तीन दिवसांपासून नजरकैदैत ठेवण्यात आले होते. मात्र, अनेक सामाजिक संघटनांकडून दबाव आल्यानंतर आझाद यांची नजरकैदेतून सुटका करण्यात आली आहे. आता, मी कोरेगाव भीमा येथे जाणार असल्याचे आझाद यांनी म्हटले आहे.
महाराष्ट्राच्या दौऱ्यावर आलेले भीम आर्मीचे संस्थापक चंद्रशेखर आझाद यांना शुक्रवारी रात्री चैत्यभूमी येथे जात असतानाच पोलिसांनी ताब्यात घेतले. त्यानंतर मालाडच्या हॉटेलमध्ये नजरकैदेत ठेवले आहे. शिवाय खबरदारीचा उपाय म्हणून राज्यभरातील भीम आर्मीच्या कार्यकर्त्यांनाही पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. त्यामुळे जांबोरी मैदानावरील आझाद यांची शनिवारची सभा रद्द झाली आहे.
पोलिसांनी संघटनेचे मुंबई प्रमुख सुनील गायकवाड, मराठवाडा विभागप्रमुख बलराज दाभाडे, पश्चिम महाराष्ट्र विभागप्रमुख अॅड. सचिन पट्टेबहादूर, अॅड. अखिल शाक्य, प्रवीण बनसोडे यांच्यासह शेकडो पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांना अटक केली. आझाद यांना भेटण्यासाठी गेलेले विद्रोही कार्यकर्ते कॉ. सुबोध मोरे यांनाही पोलिसांनी अटक केली. कार्यकर्त्यांची गर्दी वाढू लागल्याने पोलिसांनी हॉटेल परिसरात जमावबंदी लागू करून जमाव पांगवण्याचा प्रयत्न केला. भीम आर्मीच्या मालाड, दादर, शिवाजी पार्क, घाटकोपर, समतानगर, दिंडोशी येथील कार्यकर्त्यांनाही पोलिसांनी ताब्यात घेतले.
राज्य सरकारने चंद्रशेखर आझाद यांची नजरकैदेतून सुटका करण्यात आली आहे. त्यानंतर, सरफरोशी की समा आज हमारे दिल मे है... असे म्हणत मी पुण्यातील कोरेगाव-भीमा येथे जाऊन विजयस्तंभाचे दर्शन घेणार असल्याचे आझाद यांनी म्हटले आहे. तसेच मी केवळ चैत्यभूमीवर दर्शनासाठी निघालो होतो. पण, सरकारने मला नजरकैदैत ठेवले. मला विरोध करणे म्हणजे संविधानाला विरोध करणे, असल्याचेही आझाद यांनी म्हटले आहे. दरम्यान, मी महाराष्ट्र सरकारविरोधात उच्च न्यायालयात जाणार असून 1 तारखेला कोरेगाव-भीमा येथे जाणार असल्याचेही आझाद यांनी म्हटले.
कोण आहे चंद्रशेखर आझाद?
तीन वर्षांपूर्वी अॅड. चंद्रशेखर आझाद यांनी भीम आर्मीची स्थापना केली. या संघटनेच्या माध्यमातून त्यांनी विविध सामाजिक कामे केली आहेत. उत्तर प्रदेशातील सहारनपूर जिल्ह्यातील जातीय हिंसाचाराच्या घटनेमुळे तेथील योगी सरकारने त्यांच्यावर रासुका कायद्यानुसार कारवाई केली. सलग 16 महिने कारागृहात असलेल्या चंद्रशेखर आझाद यांची रासुका कायद्यातून दीड महिनाभरापूर्वी सहारनपुर कारागृहातून मुक्तता झाली. मात्र आझाद हे कारागृहात असतानाच आता देशातील दलित बहुजनांचा आक्रमक नेता अशी त्यांची प्रतिमा निर्माण झाल्याने महाराष्ट्रासह देशभरातील तरुण या संघटनेकडे आकृष्ट झाला आणि भीम आर्मी मागील दीड वर्षात देशभरात वाढली. कारागृहातून बाहेर आल्यानंतर भाजपाला सत्तेतून बाहेर करण्याची घोषणा आझाद यांनी केली होती.
1 जानेवारी 1818 मधील लढा
इंग्रज आणि पेशव्यांमध्ये झालेल्या लढाईत महार बटालीयनने मोठी कामगिरी बजावली होती. 1 जानेवारी 1818 मध्ये इंग्रजांनी पेशव्यांचा पराभव केला होता. यंदा या लढाईला 201 वर्षे पूर्ण होणार आहेत. भीमा कोरेगाव येथे या लढाईत हुतात्मा झालेल्यांच्या स्मृतिप्रित्यर्थ विजयस्तंभ उभारण्यात आला आहे. दरवर्षी लाखो आंबेडकरी जनता या विजयस्तंभाला अभिवादन करण्यासाठी येत असते. 2018 वर्षाच्या सुरुवातीलाच या ठिकाणी झालेल्या हिंसाचारामुळे देशभरात तणावाचे वातावरण निर्माण झाले होते.
कोरेगाव भीमा शौर्यदिनासाठी प्रशासन सज्ज; पाच हजार पोलिसांचा असणार बंदोबस्त
ठळक मुद्देगेल्या वर्षी 1 जानेवारी रोजी कोरेगाव भीमा येथे उसळलेल्या दंगलीच्या पार्श्वभूमीवर यंदा प्रशासन सज्ज झाले असून तब्बल पाच हजार पोलिसांचा बंदोबस्त ठेवण्यात येणार आहे.घातपात विरोधी पथक सुद्धा तैनात करण्यात येणार आहे. गावातील लोकही स्वागतासाठी उभे राहणार आहेत.जे लोक जातीय तेढ निर्माण करतात आणि शांततेस बाधा ठरतील अशा लोकांवर प्रतिबंधात्मक कारवाई करण्यात आली आहे.
पुणे - गेल्या वर्षी 1 जानेवारी रोजी कोरेगाव भीमा येथे उसळलेल्या दंगलीच्या पार्श्वभूमीवर यंदा प्रशासन सज्ज झाले असून तब्बल पाच हजार पोलिसांचा बंदोबस्त ठेवण्यात येणार आहे. त्याचबरोबर 12 एस आर पी एफच्या तुकड्या, बाराशे होमगार्ड व दोन हजार समता सैनिक दलाचे स्वयंसेवक तैनात असणार आहेत अशी माहिती कोल्हापूर परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक विश्वास नांगरेपाटील यांनी पत्रकार परिषदेत दिली. यावेळी पुणे जिल्हाधिकारी नवलकिशोर राम, पुणे ग्रामीण पोलीस अधिक्षक संदीप पाटील उपस्थित होते.
गेल्या वर्षी कोरेगाव भीमा येथे झालेल्या दंगलीत करोडो रुपयांचे नुकसान झाले होते. तसेच एका तरुणाचा मृत्यू झाला होता. या दंगलीचे परिणाम देशभरात उमटले होते. त्यामुळे यंदा कुठलाही अनुचित प्रकार घडू नये यासाठी प्रशासन सज्ज झाले आहे. नांगरेपाटील म्हणाले, कोरेगाव भीमा शौर्यदिनासाठी प्रशासन सज्ज झाले आहे. पोलीस प्रशासनाकडून विशेष खबरदारी घेण्यात येत आहे. घातपात विरोधी पथक सुद्धा तैनात करण्यात येणार आहे. गावातील लोकही स्वागतासाठी उभे राहणार आहेत. जिल्ह्याच्या बॉर्डरवर चेक पोस्ट तयार करण्यात येणार आहे. जे लोक जातीय तेढ निर्माण करतात आणि शांततेस बाधा ठरतील अशा लोकांवर प्रतिबंधात्मक कारवाई करण्यात आली आहे. तसेच सोशल मीडिया वर चुकीची माहिती पसरवणाऱ्यांवर कारवाई करण्यात येत आहे. येणाऱ्या लोकांची गैरसोय होणार नाही यासाठी प्रशासनाने चोख नियोजन केले आहे.
Buddhist Movement In India By Dr B R Ambedkar, Episode 08
Mr. Rajratna Ashok Ambedkar is the National President of The Buddhist Society of India. He is trying to revive the movement of Buddhism in India for the betterment of Individual, Society & Nation. In these video blogs, he has expressed his views on Buddhism, Dr.B.R.Ambedkar's efforts in spreading Buddhism in India, The condition of Buddhism after Dr. Ambedkar & The actions which have to take in near future. Link of Episode 1: https://youtu.be/64cIXC9IAuw Link of Episode 2: https://youtu.be/mEuoK8AkL7c Link of Episode 3: https://youtu.be/Bc67bJP3FTM Link of Episode 4: https://youtu.be/Tgl22SQD438 Link of Episode 5 https://youtu.be/5Jgj_yUq7cM Link of Episode 6 https://youtu.be/Fb8SIkjyTlk Link of Episode 7 https://youtu.be/KgszJMpy39s Link of Episode 8 https://youtu.be/JvScAe-vwdU
Sunday, 23 December 2018
हवा पालटण्यासाठी म्हणून डाॅ.बाबासाहेब आंबेडकर पन्हाळ्यास एक महिना येऊन राहिले होते
हवा पालटण्यासाठी म्हणून डाॅ.बाबासाहेब आंबेडकर पन्हाळ्यास एक महिना येऊन राहिले होते.
बाबासाहेब दररोज किंवा दिवसाआड कोल्हापूरास आपल्या मित्रांना भेटण्यास जात असत. श्री.दत्तोबा संतराम पवार व तुकाराम अप्पाजी गणेशाचार्य हे त्यांचे मित्र होते. या दोघांनाही दिवंगत शाहू महाराज यांनी सनदी वकिलाच्या सनदा दिलेल्या होत्या. न्यायाची दाद मागण्यासाठी वकिलांना भारी (खूप) फी द्यावी लागे. ते शक्य नसल्यामुळे अस्पृश्यांची कुचंबणा होत असे. म्हणून अन्यायाची दाद मागणे त्यांना सुलभ जावे या हेतूने शाहू महाराजांनी अस्पृश्य समाजात चार-सहा इयत्ता शिकलेल्यांनाही वकिलीच्या सनदा दिलेल्या होत्या. दलितांवर अन्याय होऊ नये, उलट त्यांची सर्वांगीण सुधारणा व्हावी ही महाराजांची अंतरीची तळमळ होती. (आजच्या काळातील महाराजांची तळमळ याविषयी भाष्य न केलेलं बरं!) बाबासाहेबांचे स्नेही श्री.गणेशाचार्य यांनी मात्र सनद मिळाल्यापासून कोर्टात नियमितपणे हजर राहून आपली वकिली चांगल्या प्रकारे चालविली होती.
बाबासाहेबांच्यावर या मित्रांची अढळ निष्ठा, प्रेम होते. बाबासाहेब सांगतील ते करण्याची त्यांची तयारी होती. बाबासाहेब शहरातून फिरत असता रस्त्यात जर शेंगा, मक्याची कणसे दिसली की बाबासाहेब आपली मोटार थांबवीत असत. मोटार थांबताच श्री.गणेशाचार्य तत्परतेने कणसे, शेंगावाल्यांकडे किंवा शेंगावालीकडे घाईने जात व आपल्या इस्त्रीचा शर्ट पुढे करुन त्यात शेंगा वगैरे घेत असत. भाजलेल्या शेंगाच्या राखेने त्यांचा शर्ट खराब होत असे. पण बाबासाहेबांच्या व्यक्तीमत्वाने ते मोहून गेलेले असल्यामुळे त्यांच्यापुढे आपल्या कपड्याचीच नव्हे तर शरीराची देखील काही किंमत श्री.गणेशाचार्य यांना वाटत नसे. बाबासाहेबांच्या मित्रांनाही सर्वस्वाचा विसर पडावा इतके व्यक्तीमत्व महान होते. बाबासाहेब त्यांच्याशी वागताना अत्यंत सम-भावनेने वागत असत. कोणत्याही प्रकारचा अहंपणा ते बाळगीत नसत. अगदी बरोबरीच्या नात्याने ते त्यांच्याशी वागत असत.
डाॅ.आंबेडकरांचा सांगाती या पुस्तकातून
सूचना:- कंसातील वाक्य वरील पुस्तकातील नाही.
बाबासाहेब दररोज किंवा दिवसाआड कोल्हापूरास आपल्या मित्रांना भेटण्यास जात असत. श्री.दत्तोबा संतराम पवार व तुकाराम अप्पाजी गणेशाचार्य हे त्यांचे मित्र होते. या दोघांनाही दिवंगत शाहू महाराज यांनी सनदी वकिलाच्या सनदा दिलेल्या होत्या. न्यायाची दाद मागण्यासाठी वकिलांना भारी (खूप) फी द्यावी लागे. ते शक्य नसल्यामुळे अस्पृश्यांची कुचंबणा होत असे. म्हणून अन्यायाची दाद मागणे त्यांना सुलभ जावे या हेतूने शाहू महाराजांनी अस्पृश्य समाजात चार-सहा इयत्ता शिकलेल्यांनाही वकिलीच्या सनदा दिलेल्या होत्या. दलितांवर अन्याय होऊ नये, उलट त्यांची सर्वांगीण सुधारणा व्हावी ही महाराजांची अंतरीची तळमळ होती. (आजच्या काळातील महाराजांची तळमळ याविषयी भाष्य न केलेलं बरं!) बाबासाहेबांचे स्नेही श्री.गणेशाचार्य यांनी मात्र सनद मिळाल्यापासून कोर्टात नियमितपणे हजर राहून आपली वकिली चांगल्या प्रकारे चालविली होती.
बाबासाहेबांच्यावर या मित्रांची अढळ निष्ठा, प्रेम होते. बाबासाहेब सांगतील ते करण्याची त्यांची तयारी होती. बाबासाहेब शहरातून फिरत असता रस्त्यात जर शेंगा, मक्याची कणसे दिसली की बाबासाहेब आपली मोटार थांबवीत असत. मोटार थांबताच श्री.गणेशाचार्य तत्परतेने कणसे, शेंगावाल्यांकडे किंवा शेंगावालीकडे घाईने जात व आपल्या इस्त्रीचा शर्ट पुढे करुन त्यात शेंगा वगैरे घेत असत. भाजलेल्या शेंगाच्या राखेने त्यांचा शर्ट खराब होत असे. पण बाबासाहेबांच्या व्यक्तीमत्वाने ते मोहून गेलेले असल्यामुळे त्यांच्यापुढे आपल्या कपड्याचीच नव्हे तर शरीराची देखील काही किंमत श्री.गणेशाचार्य यांना वाटत नसे. बाबासाहेबांच्या मित्रांनाही सर्वस्वाचा विसर पडावा इतके व्यक्तीमत्व महान होते. बाबासाहेब त्यांच्याशी वागताना अत्यंत सम-भावनेने वागत असत. कोणत्याही प्रकारचा अहंपणा ते बाळगीत नसत. अगदी बरोबरीच्या नात्याने ते त्यांच्याशी वागत असत.
डाॅ.आंबेडकरांचा सांगाती या पुस्तकातून
सूचना:- कंसातील वाक्य वरील पुस्तकातील नाही.
💥 एक प्रसंग (१९३६) चिकोडीची (कर्नाटक) सभा (निवडणूक प्रचारासाठी)
चिकोडीची (कर्नाटक) सभा (निवडणूक प्रचारासाठी) रात्री सुमारे बारा वाजता सुरु करण्यात आली. दिवसभराच्या परिश्रमामुळे, दगदगीमुळे बाबासाहेबांच्या प्रकृतीवर बराच ताण पडला होता. बाबासाहेबांना त्या सभेत उठून उभे राहणे अशक्य झाले. त्यामुळे चिकोडीची सभा त्यावेळी रद्द करून ती दुसऱ्या दिवशी सकाळी घेतली. त्या रात्री चिकोडीतच बाबासाहेबांनी मुक्काम केला. तेथील डाक बंगल्यात त्यांची राहण्याची सोय केली होती. त्या दिवशी बाबासाहेबांना फारच त्रास झाला होता. पक्ष किंवा समाजाचे कार्य स्वतःच्या शरीरापेक्षाही अधिक महत्त्वाचे आहे अशी त्यांची धारणा होती. त्यामुळे सतत १८ तास त्यांचा दौरा चालला होता. डाक बंगल्यात गेल्यानंतर बाबासाहेबांनी तेथील एका भिंतीवर डोके ठेवून भिंतीला लागून बराच वेळ उभे राहिले होते. बाबासाहेबांना झालेला हा त्रास पाहून तेथे असलेल्या आम्हां मंडळींना फार वाईट वाटले व आम्ही बाबासाहेबांना त्रास देत असल्याबद्दल आम्हांलाही पश्चात्ताप झाला.
आम्ही दोघातिघांनी बाबासाहेबांना धरून टेबलाजवळ नेले. त्या दिवसाच्या परिश्रमामुळे त्यांचे खाण्यावर देखील लक्ष नव्हते. आम्ही आग्रह करून त्यावेळी थोडे खायला लावले. थोडे दूध प्यायला दिले. नंतर त्यांना तसेच अंथरूणावर झोपवले. समाजाचे कार्य करता आपले काय होईल, याचा ते कधीही विचार करीत नसत. शरीराला कितीही त्रास पडला, प्रसंगी उपास काढावा लागला तर कोणाजवळही त्याबद्दल ते अवाक्षरही बोलत नसत. बाबासाहेबांनी संपूर्णतया आपले तनमनधन समाजकार्याला वाहून घेतले होते.
डाॅ.आंबेडकरांचा सांगाती या पुस्तकातून
आम्ही दोघातिघांनी बाबासाहेबांना धरून टेबलाजवळ नेले. त्या दिवसाच्या परिश्रमामुळे त्यांचे खाण्यावर देखील लक्ष नव्हते. आम्ही आग्रह करून त्यावेळी थोडे खायला लावले. थोडे दूध प्यायला दिले. नंतर त्यांना तसेच अंथरूणावर झोपवले. समाजाचे कार्य करता आपले काय होईल, याचा ते कधीही विचार करीत नसत. शरीराला कितीही त्रास पडला, प्रसंगी उपास काढावा लागला तर कोणाजवळही त्याबद्दल ते अवाक्षरही बोलत नसत. बाबासाहेबांनी संपूर्णतया आपले तनमनधन समाजकार्याला वाहून घेतले होते.
डाॅ.आंबेडकरांचा सांगाती या पुस्तकातून
जात कळली नव्हती -- प्रविण वैद्य
जात कळली नव्हती
चौकातील पुतळा थोडा तुटला होता
जरासा फुटला होता..
झाली होती त्याची विटंबना
मोर्चेकरीही तयार होते..
दंग्यांची मात्र सुरुवात झाली नव्हती
कारण अजूनही पुतळ्याची..
जात कळली नव्हती
बलात्कारी पीडिता किंचाळत होती
अत्याचाराचा न्याय मागत होती..
जनता नेहमी सारखच फक्त बघत होती
मदत करणारच होतो हो आम्ही..
पण अजूनही पीडितेची ..
जात कळली नव्हती
छळलं होत त्याला व्यवस्थेनं
म्हणून त्यानं आत्महत्या केली होती..
ठरतील आता त्याचे समर्थक-विरोधक
सोबत होईल राजकारणही
मग हि शांतता कसली..
कारण अजूनही मरणाऱ्याची ..
जात कळली नव्हती
वाचलेलं पुस्तक अन त्यातला गाभा
कळलेला इतिहास आणि त्यातले संदर्भ
खर मानाव कि खोट
तेच उमगत नव्हतं..
कारण अजूनही लिहिणाऱ्याची ..
जात कळली नव्हती
शेवटी एवढंच..
जात कळत नाही म्हणून
माणसं टाळू नका
जाती अंता साठी..
जातीचा अंत पाहू नका
- प्रविण वैद्य
चौकातील पुतळा थोडा तुटला होता
जरासा फुटला होता..
झाली होती त्याची विटंबना
मोर्चेकरीही तयार होते..
दंग्यांची मात्र सुरुवात झाली नव्हती
कारण अजूनही पुतळ्याची..
जात कळली नव्हती
बलात्कारी पीडिता किंचाळत होती
अत्याचाराचा न्याय मागत होती..
जनता नेहमी सारखच फक्त बघत होती
मदत करणारच होतो हो आम्ही..
पण अजूनही पीडितेची ..
जात कळली नव्हती
छळलं होत त्याला व्यवस्थेनं
म्हणून त्यानं आत्महत्या केली होती..
ठरतील आता त्याचे समर्थक-विरोधक
सोबत होईल राजकारणही
मग हि शांतता कसली..
कारण अजूनही मरणाऱ्याची ..
जात कळली नव्हती
वाचलेलं पुस्तक अन त्यातला गाभा
कळलेला इतिहास आणि त्यातले संदर्भ
खर मानाव कि खोट
तेच उमगत नव्हतं..
कारण अजूनही लिहिणाऱ्याची ..
जात कळली नव्हती
शेवटी एवढंच..
जात कळत नाही म्हणून
माणसं टाळू नका
जाती अंता साठी..
जातीचा अंत पाहू नका
- प्रविण वैद्य
मराठा आरक्षण और आर्थिक आरक्षण पर राजरत्न आंबेडकर ने ये कर दी बहोत बड़ी बात MARATHA THOK MORCHA
मराठा आरक्षण और आर्थिक आरक्षण पर राजरत्न आंबेडकर ने ये कर दी बहोत बड़ी बात MARATHA THOK MORCHA
Rajratna Ambedkar speech on Constitution awareness | राजरत्न अम्बेडकर का संविधान पर दमदार भाषण
राजरत्न आंबेडकर - मुद्द्याचा बोला, साम टी.व्ही. मराठी वाहिनी - दलित ऐक्य होणार तरी कधी?
राजरत्न आंबेडकर - मुद्द्याचा बोला, साम टी.व्ही. मराठी वाहिनी - दलित ऐक्य होणार तरी कधी?
जानिये यदि दलित अपना धर्म 'हिंदू' की जगह 'बौद्ध' लिखेगा तो क्या होने वाला है YouTube 480p
जानिये यदि दलित अपना धर्म 'हिंदू' की जगह 'बौद्ध' लिखेगा तो क्या होने वाला है YouTube 480p
Buddhist Movement In India By Dr B R Ambedkar, Episode 07
Buddhist Movement In India By Dr B R Ambedkar, Episode 06
Saturday, 22 December 2018
येणाऱ्या काळात विद्यार्थ्यांसमोर असणारी आव्हाने- प्रकाश आंबेडकर यांचं विद्यार्थ्यांना मार्गदर्शन
Friday, 21 December 2018
होलार समाज भव्य मेळावा पंढरपूर येथील प्रकाश आंबेडकर यांच मार्गदर्शनीय भाषण (Full Speech)
Sunday, 16 December 2018
प्रकाश आंबेडकर भारतीय अर्थव्यवस्थेवर नागपूर महाअधिवेशनात मध्ये काय म्हणाले (Full Speech)
‘महाराष्ट्र MOST’ सत्रात वारीस पठाण, मंत्री राम शिंदे व प्रकाश आंबेडकर | महाराष्ट्र महामंथन LIVE-TV9
वारीस पठाण यांच्यासह जलसंधारण मंत्री राम शिंदे, भारिप बहुजन महासंघाचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांच्याशी मंथन .
AIMIM MLA Imtiyaz Laleel Nagpur full speech , इम्तियाज़ जलील ने छोटेसे भाषण में कह दि बड़ी बात
Saturday, 15 December 2018
Sunday, 9 December 2018
Buddhist Movement In India By Dr B R Ambedkar, Episode 05
Thursday, 6 December 2018
Sunday, 2 December 2018
Buddhist Movement In India By Dr B R Ambedkar, Episode 04
Link of Episode 1: https://youtu.be/64cIXC9IAuw
Link of Episode 2: https://youtu.be/mEuoK8AkL7c
Link of Episode 3: https://youtu.be/Bc67bJP3FTM
Link of Episode 4: https://youtu.be/Tgl22SQD438
Please share, like & subscribe the channel
Subscribe to:
Posts (Atom)