Tuesday, 1 January 2019

समाजाच्या कल्याणासाठी केवळ चणेफुटाणे खाऊन कार्य करणारे बाबासाहेबांच्या सारखे नेते जगाच्या पाठीवर कोणी असतील काय?

बाबासाहेब स्वतःपेक्षा दुसऱ्याचीच काळजी करीत होते. दुसऱ्यांच्या मनाला जपत होते. ही जाणीव सात्विकवृत्तीच्या मनुष्यातच असते. अशी व्यक्ती स्वतः झिजते आणि दुसऱ्यांना आनंद देते. डाॅ.बाबासाहेबांचा बराच काळ जरी पाश्चात्त्य देशात गेला होता, तरी त्यांनी आपल्या समाजाच्या
परिस्थितीचा बारकाईने अभ्यास केला होता व परिस्थितीला अनुसरून वागण्याची त्यांनी आपल्याला सवय लावून घेतली होती. महाडच्या सत्याग्रहाच्या वेळी बाबासाहेबांच्यासह सर्व सत्याग्रहींनी केवळ चणेफुटाणे खाऊन ती रात्र घालविली. समाजाच्या कल्याणासाठी केवळ चणेफुटाणे खाऊन कार्य करणारे बाबासाहेबांच्या सारखे नेते जगाच्या पाठीवर कोणी असतील काय?

No comments:

Post a Comment