शौर्य दिन २०१९ :
नजर जाईल तिथपर्यंत निळे झेंडे, नजर जाईल तिथपर्यंत भीम सैनिक. पोलिस प्रशासन आणि पालिका प्रशासनाची दमछाक करणारी रेकॉर्ड ब्रेक गर्दी.
याचं सगळं श्रेय जातं किडे भुर्जी आणि त्यांच्या दगडी गँगला. धन्यवाद भुर्जी तुमच्यामुळे हा शौर्य दिन भारताच्या कानाकोपऱ्यातच नाहीतर परदेशात पोहचला. तुम्हाला काय वाटलं दोन चार शेंबडी पोरं घेऊन दोन चार खडे मारले तर हे लोक भिऊन पळून जातील आणि परत इकडे येणार नाहीत, तुम्ही जेवढा जोर लावून आम्हाला रोखण्याचा प्रयत्न केला त्याच्या दुप्पट ताकतीने आम्ही पुढे आलो. आणि यापुढेही येत राहू.
गेल्या वर्षी पर्यंत आमच्यापैकी ही बऱ्याच लोकांना भीमाकोरेगाव बद्दल माहिती नव्हती. आता सर्वच समाजातल्या चील्या पिल्याला माहिती झालीय. त्याबद्दल धन्यवाद तुम्हाला.
पुण्यापासून कोरेगाव पर्यंत, तिकडे तळेगाव पासून शिक्रापूर, कोरेगाव पर्यंत सर्वच रस्त्याने गावागावात, चौकाचौकात पोलिसांच्या तुकड्या, जीप उभ्या होत्या. कोणी पळताना दिसलं तरी पोलिस सावध होत होते. त्याला थांबवत होते नि पळू नको म्हणून सांगत होते. दोन्ही मार्गाने येणारे रस्ते ५-७ किलोमीटर मागेच अडवले होते. प्रत्येकाने आपापल्या गाड्या तिथे पार्क करून तिथून पुढे बस ने जायची सोय केली होती. मिनिटागनिक बसेस फिरत होत्या तरी देखील गर्दी संपत नव्हती. वढू गावाहून येणाऱ्या लोकांची मात्र गैरसोय झाली. त्यांना वढू गावातच गाडी थांबवून पुढे चालत यावं लागत होतं. नंतर संध्याकाळी उशिरा तिकडे पण बस सुरू केल्याचं कळलं. अगदी सकाळी १० वाजता कोरेगावहून परत घरी जाणारे लोक भेटत होते तर संध्याकाळी ६ वाजता ही कोरेगाव कडे येणारे लोक दिसत होते. कोरेगावकरांनी यापूर्वी अशी गर्दी कधीच पहिली नसावी ना भूतो ना भविष्य. म्हणुन त्यांनी नेहमीप्रमाणे कडकडीत बंद पाळला होता. कोरेगाव पासून शिक्रापूर पर्यंत सर्वच दुकानं जवळपास बंद होती. कुठे एखादं दुसरं चालू होतं.
पोलिस प्रशासन आणि पालिका प्रशासनाने व्यवस्थापन चोख करण्याचा पुरेपूर प्रयत्न केला. काही अंशी यशस्वी ही झाला. सर्वच गाड्या स्तंभ परिसरात नेऊ दिल्या असत्या तर आजपर्यंत ट्रॅफिक क्लिअर झालं नसतं. सगळेच जण अडकून पडले असते. जिवाचं रान करून पोलिस आणि समता सैनिक दलाचे जवान झटत होते. धुळीत, फुफाट्यात तसेच उभे होते. काहींनी तोंडाला रुमाल बांधले होते. त्यांना पाहून वाटलं की त्यांना मास्क आणून द्यावे पण अशी काहीच तयारी केली नव्हती त्यामुळे ते शक्य झालं नाही. समता सैनिक दलाचे जवळपास दोन हजरांहून जास्त जवान होते. टॉयलेट, ॲम्बुलंस, फायर ब्रिगेड, प्रथोपचार, सीसीटिव्ही कॅमेरे, ड्रोन, पाण्याचे टँकर इत्यादी सुविधा मला पहिल्यांदाच दिसल्या. ४-५ न्युज चॅनल च्या गाड्या होत्या. न्युजवाले लाईव्ह दाखवत होते. दोन - तीन ठिकाणी मोफत अन्नवाटप देखील होते. स्तंभाच्या पाठीमागे पूजा सकट आणि धर्मा डांबळे यांच्या स्मरणार्थ अन्न छत्र उभारले होते. तर रोडवर एक दोन ठिकाणी वडापाव व चहाचे स्टॉल पण दिसले.
तसेच आपल्या लोकांनी भीमा कोरेगावला येणाऱ्या-जाणाऱ्या लोकांसाठी जमेल तिथे पाण्याचे आणि अन्न वाटपाचे स्टॉल मांडले होते. तळेगाव मधे एका ठिकाणी मोफत अन्न वाटपाचा स्टॉल होता तर चाकण मधे पाण्याचे स्टॉल होते. गेल्या वर्षी झालेली गैरसोय लक्षात घेता यावर्षी सर्वांनी आपापल्या परीने जमेल तशी मदत लोकांना देवू केली.
स्तंभ परिसरात सभा घेण्यास बंदी होती. तरी फक्त एक भारतीय बौद्ध महासभेचा मंडप होता. आद. बाळासाहेब सकाळीच येऊन गेले होते. दुपारी ज. वी. पवार, भीमराव आंबेडकर व आनंदराजजी यांची भाषणे सुरू होती. दुपारी उशिरा चंद्रशेखर आझाद ही मानवंदना देण्यासाठी आले. नंतर महार रेजिमेंट चे जवान ही मानवंदना देण्यासाठी आले असं स्पीकर वर ऐकायला मिळालं. प्रशासनाने बांधलेल्या अंदाजापेक्षा कितीतरी जास्त गर्दी होती त्यामुळे त्यांची पुरती दमछाक झाली. शिवाय दरवर्षी प्रमाणे दुपारी संध्याकाळी निवांत जाऊ असा अंदाज बांधणाऱ्याचाही अंदाज चुकला दिवसाच्या उत्तरार्धात गर्दी जास्त वाढली. नेहमी पेक्षा पुस्तकांचे आणि इतर बाबासाहबांचे फोटो प्रतिमांचे स्टॉल ही जास्त होते. चैत्यभूमी प्रमाणे इथेही बार्टीेचा स्टॉल होता. बार्टीेने १५% दराने संविधान, बाबासाहबांचे चरीत्र बारा खंड आणि इतर महत्त्वाची पुस्तके उपलब्ध करून दिली. भरपूर लोकांनी याचा लाभ घेतला.
एकंदर विरोधकांच्या आणि जातीवाद्यांच्या बुडाला जास्त आग लावून कालचा शौर्यदिन पार पडला. अपेक्षा फक्त एवढीच की ही गर्दी निवडणुकीच्या वेळेला दिसावी. आंबेडकरवाद्यांनी प्रत्येक ऐतिहासिक घटनेचा इव्हेंट केलाय. शौर्यदिन, महाडचा सत्याग्रह दिन, आंबेडकर जयंती, नाशिकचा सत्याग्रह दिन, धर्मांतर दिन, महापरिनिर्वाण दिन, देहूरोडचा विहार स्थापन दिन इतर कोणताच समाज एका वर्षात इतक्या वेळा एकत्र येत नसेल तितक्या वेळा आपण येतो. पण याचा फायदा खुप कमी करून घेतो. ही सगळी शक्ती - एकी मतपेटीतून दिसली पाहिजे. १९५६ साली संसदेत काँग्रेस नंतर सर्वात जास्त लोकसंख्या शेडूल्ड कास्ट फेडरेशनची होती, त्यावेळची काँगेसची सर्वात मोठी विरोधी शक्ती होती. संसदेत आज आपले किती सदस्य आहेत.? याचा प्रत्येकाने विचार करावा.
२०१९ सुरू झाला आहे.
जयभीम 🙏
नजर जाईल तिथपर्यंत निळे झेंडे, नजर जाईल तिथपर्यंत भीम सैनिक. पोलिस प्रशासन आणि पालिका प्रशासनाची दमछाक करणारी रेकॉर्ड ब्रेक गर्दी.
याचं सगळं श्रेय जातं किडे भुर्जी आणि त्यांच्या दगडी गँगला. धन्यवाद भुर्जी तुमच्यामुळे हा शौर्य दिन भारताच्या कानाकोपऱ्यातच नाहीतर परदेशात पोहचला. तुम्हाला काय वाटलं दोन चार शेंबडी पोरं घेऊन दोन चार खडे मारले तर हे लोक भिऊन पळून जातील आणि परत इकडे येणार नाहीत, तुम्ही जेवढा जोर लावून आम्हाला रोखण्याचा प्रयत्न केला त्याच्या दुप्पट ताकतीने आम्ही पुढे आलो. आणि यापुढेही येत राहू.
गेल्या वर्षी पर्यंत आमच्यापैकी ही बऱ्याच लोकांना भीमाकोरेगाव बद्दल माहिती नव्हती. आता सर्वच समाजातल्या चील्या पिल्याला माहिती झालीय. त्याबद्दल धन्यवाद तुम्हाला.
पुण्यापासून कोरेगाव पर्यंत, तिकडे तळेगाव पासून शिक्रापूर, कोरेगाव पर्यंत सर्वच रस्त्याने गावागावात, चौकाचौकात पोलिसांच्या तुकड्या, जीप उभ्या होत्या. कोणी पळताना दिसलं तरी पोलिस सावध होत होते. त्याला थांबवत होते नि पळू नको म्हणून सांगत होते. दोन्ही मार्गाने येणारे रस्ते ५-७ किलोमीटर मागेच अडवले होते. प्रत्येकाने आपापल्या गाड्या तिथे पार्क करून तिथून पुढे बस ने जायची सोय केली होती. मिनिटागनिक बसेस फिरत होत्या तरी देखील गर्दी संपत नव्हती. वढू गावाहून येणाऱ्या लोकांची मात्र गैरसोय झाली. त्यांना वढू गावातच गाडी थांबवून पुढे चालत यावं लागत होतं. नंतर संध्याकाळी उशिरा तिकडे पण बस सुरू केल्याचं कळलं. अगदी सकाळी १० वाजता कोरेगावहून परत घरी जाणारे लोक भेटत होते तर संध्याकाळी ६ वाजता ही कोरेगाव कडे येणारे लोक दिसत होते. कोरेगावकरांनी यापूर्वी अशी गर्दी कधीच पहिली नसावी ना भूतो ना भविष्य. म्हणुन त्यांनी नेहमीप्रमाणे कडकडीत बंद पाळला होता. कोरेगाव पासून शिक्रापूर पर्यंत सर्वच दुकानं जवळपास बंद होती. कुठे एखादं दुसरं चालू होतं.
पोलिस प्रशासन आणि पालिका प्रशासनाने व्यवस्थापन चोख करण्याचा पुरेपूर प्रयत्न केला. काही अंशी यशस्वी ही झाला. सर्वच गाड्या स्तंभ परिसरात नेऊ दिल्या असत्या तर आजपर्यंत ट्रॅफिक क्लिअर झालं नसतं. सगळेच जण अडकून पडले असते. जिवाचं रान करून पोलिस आणि समता सैनिक दलाचे जवान झटत होते. धुळीत, फुफाट्यात तसेच उभे होते. काहींनी तोंडाला रुमाल बांधले होते. त्यांना पाहून वाटलं की त्यांना मास्क आणून द्यावे पण अशी काहीच तयारी केली नव्हती त्यामुळे ते शक्य झालं नाही. समता सैनिक दलाचे जवळपास दोन हजरांहून जास्त जवान होते. टॉयलेट, ॲम्बुलंस, फायर ब्रिगेड, प्रथोपचार, सीसीटिव्ही कॅमेरे, ड्रोन, पाण्याचे टँकर इत्यादी सुविधा मला पहिल्यांदाच दिसल्या. ४-५ न्युज चॅनल च्या गाड्या होत्या. न्युजवाले लाईव्ह दाखवत होते. दोन - तीन ठिकाणी मोफत अन्नवाटप देखील होते. स्तंभाच्या पाठीमागे पूजा सकट आणि धर्मा डांबळे यांच्या स्मरणार्थ अन्न छत्र उभारले होते. तर रोडवर एक दोन ठिकाणी वडापाव व चहाचे स्टॉल पण दिसले.
तसेच आपल्या लोकांनी भीमा कोरेगावला येणाऱ्या-जाणाऱ्या लोकांसाठी जमेल तिथे पाण्याचे आणि अन्न वाटपाचे स्टॉल मांडले होते. तळेगाव मधे एका ठिकाणी मोफत अन्न वाटपाचा स्टॉल होता तर चाकण मधे पाण्याचे स्टॉल होते. गेल्या वर्षी झालेली गैरसोय लक्षात घेता यावर्षी सर्वांनी आपापल्या परीने जमेल तशी मदत लोकांना देवू केली.
स्तंभ परिसरात सभा घेण्यास बंदी होती. तरी फक्त एक भारतीय बौद्ध महासभेचा मंडप होता. आद. बाळासाहेब सकाळीच येऊन गेले होते. दुपारी ज. वी. पवार, भीमराव आंबेडकर व आनंदराजजी यांची भाषणे सुरू होती. दुपारी उशिरा चंद्रशेखर आझाद ही मानवंदना देण्यासाठी आले. नंतर महार रेजिमेंट चे जवान ही मानवंदना देण्यासाठी आले असं स्पीकर वर ऐकायला मिळालं. प्रशासनाने बांधलेल्या अंदाजापेक्षा कितीतरी जास्त गर्दी होती त्यामुळे त्यांची पुरती दमछाक झाली. शिवाय दरवर्षी प्रमाणे दुपारी संध्याकाळी निवांत जाऊ असा अंदाज बांधणाऱ्याचाही अंदाज चुकला दिवसाच्या उत्तरार्धात गर्दी जास्त वाढली. नेहमी पेक्षा पुस्तकांचे आणि इतर बाबासाहबांचे फोटो प्रतिमांचे स्टॉल ही जास्त होते. चैत्यभूमी प्रमाणे इथेही बार्टीेचा स्टॉल होता. बार्टीेने १५% दराने संविधान, बाबासाहबांचे चरीत्र बारा खंड आणि इतर महत्त्वाची पुस्तके उपलब्ध करून दिली. भरपूर लोकांनी याचा लाभ घेतला.
एकंदर विरोधकांच्या आणि जातीवाद्यांच्या बुडाला जास्त आग लावून कालचा शौर्यदिन पार पडला. अपेक्षा फक्त एवढीच की ही गर्दी निवडणुकीच्या वेळेला दिसावी. आंबेडकरवाद्यांनी प्रत्येक ऐतिहासिक घटनेचा इव्हेंट केलाय. शौर्यदिन, महाडचा सत्याग्रह दिन, आंबेडकर जयंती, नाशिकचा सत्याग्रह दिन, धर्मांतर दिन, महापरिनिर्वाण दिन, देहूरोडचा विहार स्थापन दिन इतर कोणताच समाज एका वर्षात इतक्या वेळा एकत्र येत नसेल तितक्या वेळा आपण येतो. पण याचा फायदा खुप कमी करून घेतो. ही सगळी शक्ती - एकी मतपेटीतून दिसली पाहिजे. १९५६ साली संसदेत काँग्रेस नंतर सर्वात जास्त लोकसंख्या शेडूल्ड कास्ट फेडरेशनची होती, त्यावेळची काँगेसची सर्वात मोठी विरोधी शक्ती होती. संसदेत आज आपले किती सदस्य आहेत.? याचा प्रत्येकाने विचार करावा.
२०१९ सुरू झाला आहे.
जयभीम 🙏
No comments:
Post a Comment