Tuesday, 6 September 2016

( पोस्ट नः 145 ) बुध्द आणि त्यांचा धम्म तिसरा खंडः भाग पहिला

( पोस्ट नः 145 )

    बुध्द आणि त्यांचा धम्म
    तिसरा खंडः भाग पहिला

19) यानंतर त्याने उपालीला विनयाचे पाठ म्हणायला सांगितले आणि संगीतीला विचारले हे बरोबर आहे काय ? संगीतीने होकारत्मक उत्तर देताच त्या प्रश्नावर अधिक चर्चा न वाढविता अध्यक्ष काश्यप तो प्रश्न तिथेच संपवावा.

20) हा पठणानंतर वस्तुतः काश्यपाने संगतीत उपस्थित असलेल्या कोणाला तरी तथागत बुध्दांच्या जीवनातील काही महत्वाच्या घटना कथन करण्याची आज्ञा द्यावयास हवी होती

21) परंतु काश्यापाने असे काहीच केले नाही . त्याने असा विचार केला असावा कि संघाला आपण विचारलेल्या केवळ दोन प्रश्नांशीच कर्तव्ये आहे

22) काश्यपाने तथागत बुध्दांच्या जीवनातील प्रमुख घटनांचे संकलन केला असते तर आज आपणाला तथागत बुध्दांचे संपुण चरित्र उपलब्ध झाले असते.

23) तथागत बुध्दांच्या जीवनातील घटनांचे संकलन करण्याचे काश्यपाला का सुचले नसावे. ?

24)  केवळ उपेक्षा हे त्याचे उत्तर होऊ शकत नाही , ह्याचे उत्तर म्हणजे तथागत बुध्दांनी आपल्या धम्मशासनात आपणा स्वतःसाठी विशेष स्थान निर्मिलेले नाही हेच होय.

25) बुध्द आणि त्यांचा धम्म या दोन अगदी अलग गोष्टी होत .

26) तथागत बुध्द स्वतःला आपल्या धम्मशासनापासुन अलग मानीत असे याचे दुसरे उदाहरण म्हणजे आपण उत्तराधिकारी नेमण्यास त्याने दिलेला नकार

27) दोन तीन वेळेला त्याच्या अनुयायानी त्यांच्या पश्चयात अधिकार ज्याने चालवायचा त्याचा निर्देश करण्याची विंनती केली

28) आणि प्रत्येक वेळी तथागत बुध्दांनी तसे नाकारले .

29) धम्म हाच आपला स्वतःचा उत्तराधिकारी , असे त्याचे प्रत्येक वेळी उत्तर असे .

30) धम्म हा स्वतःच्या अंगी सामर्थ्यानेच जगला पाहिजे . त्याच्या मागील माणसांच्या सत्तेने नव्हे

31) ज्या धम्माला जगायला पाठीमागे माणसांच्या सत्तेचे बळ लागते तो धम्मच नव्हे

32) धम्माची सत्ता चालावयास प्रत्येक वेळी संस्थापकाचे नाव घेणे आवश्यक भासत असेल तर तो धम्मच नव्हे

33) धम्म आणि त्यातील आपले स्थान यासंबधी तथागत बुध्दांचा दृष्टीकोन अशा प्रकारचा होता.

रोज वाचा
    " बुध्द आणि त्यांचा धम्म

 पुढील पोस्ट मध्ये
बुध्दांनी मोक्षदानाचे आश्वासन दिले नाही

     तथागत म्हणतात मी "मार्गदाता आहे ,मोक्षदाता नाही
1) " समतेच्या विचारांच्या प्रत्येक व्यक्तीने प्रत्येक रविवारी बुध्द  विहारात सकाळी  गेलेच पाहिजे"

2) अन्याय करणारयापेक्षा अन्याय सहन करणारा सगळ्यात मोठा गुन्हेगार असतो "
*******
        विश्वरत्न
   डाँ.बाबासाहेब आंबेडकर

INDIA THAT IS BHARAT

No comments:

Post a Comment