Sunday, 18 September 2016

पोस्ट नः 160 बुध्द आणि त्यांचा धम्म तिसरा खंडः भाग दुसरा 5) सर्व संस्कार अशाश्वत आहे असे मानणे म्हणजे धम्म

पोस्ट नः 160

  बुध्द आणि त्यांचा धम्म
   तिसरा खंडः भाग दुसरा
 
5) सर्व संस्कार अशाश्वत आहे असे मानणे म्हणजे धम्म
------------------

1) अनित्यतेच्या सिंध्दांताला तीन पैलु असतात.

2) अनेक तत्वांनी बनलेल्या वस्तु अनित्य आहे

3) व्यक्तीगत रुपाने प्राणी अनित्य आहे

4) प्रतीत्य समुत्पन्न वस्तुंचे आत्मतत्व अनित्य आहे

5) अनेक तत्व मिळुन बनलेल्या वस्तुंची अनित्यता बौध्दत्वताचा असंग याने चांगल्या प्रकारे स्पष्ट केली आहे

6) असंग म्हणतो सर्व वस्तु ह्या हेतु आणि प्रत्यय ह्यामुळे उत्पन्न होतात. त्यांना त्यांचे असे अगदी स्वतंत्र अस्तित्व नसते. हेतु प्रत्ययांचा उच्छेद झाला की वस्तुंचे अस्तित्व ठरत नाही

7) सजीव प्राण्यांचे शरीर म्हणजे पृथ्वी,आप ,तेज, आणि वायु या चार महाभुतांचा परिणाम होय, आणि ह्या चार भूतांचे पृथ्वकरण झाले कि हा प्राणी प्राणी म्हणुन उरत नाही

8) अनेक तत्वे मिळुन झालेली वस्तु अनित्य आहे ह्या वचनाचा अभिप्राय वरील प्रकारचा आहे

9) सजीव प्राण्यांच्या आनित्यतेचे वर्णन तो नाही ,तो होत नाही ह्या शब्दात करता येईल या शब्दात करता येईल

10) ह्या अर्थाने पाहिले असता जो प्राणी भूतकाळात जीवन व्यतीत करीत होता तोच प्राणी वर्तमानकाळात असु शकत नाही. आणि तोच प्राणी भविष्यकाळात असु शकणार नाही. भविष्यकाळी जो प्राणी असेल तो पुर्वी नव्हता आणि तोच आजही नाही. वर्तमानकाळी जो प्राणी आहे तोच पुर्वी नव्हता आणि पुढेही तोच असणार नाही

11) म्हणजेच मनुष्यप्राणी हा परिवर्तनशील आणि संवर्धनशील आहे आपल्या जीवनाच्या कोणत्याही दोन क्षणी तो असु शकत नाही

12) अनित्यतेच्या सिध्दांताचा तिसरा पैलु सामान्य माणसाला समजायला कठीण आहे

13) प्रत्येक सजीव प्राणी केव्हि ना केव्हा तरी मरणार हे समजायला सोपे आहे

14) परंतु ती जिंवत असताना सारखा बदलत आहे किंवा बनत आहे हे समजावयास कठीण आहे

15) हे परिवर्तन कसे शक्य आहे? याला तथागतांचे उत्तर असे " सर्वच अनित्य असल्यामुळे हे शक्य आहे "

16) ह्याच विचारसारणीतुन पुढे शुन्यवादाचा उदय झाला

17) बौध्द शुन्यवाद म्हणजे पुर्णपणे अनास्तित्ववाद नव्हे . त्याचा अर्थ ऐवढाच की, ह्या ऐहिक जगात प्रतिक्षणी चालु आहे.

18) शुन्यतेमुळेच सर्व अस्तित्व शक्य होते ही गोष्ट फार थोड्यांच्या लक्षात येते शुन्यतेशिवाय काहीही शक्य झाले नसते . सर्व वस्तुंच्या स्वभावाच्या अनित्यतेवरच इतर दुसरया वस्तुंचे अस्तित्व अवलंबुन आहे.

19) जर वस्तु सतत परिवर्तनशील नसत्या, नित्य व अपरिवर्तनशील असत्या तर एका प्रकारापासुन  दुसरया प्रकारात जीवनाचे जे उत्क्रमण आणि सजीव वस्तुंचा जो विकास चालला आहे त्याला मिळाला असता.

20) जर मनुष्यप्राणी मरणाधीन अथवा परिवर्तनशील नसता आणि एकाच स्थितीत तसाच राहिला असता तर काय परिणाम झाला असता ? असे झाले असते तर मानवजातीची प्रगती खुंटली असती

21) शुन्य म्हणजे अभाव असे मानले असते तर मोठीच अनवस्था उदभवली असती

22) परंतु तसे मानलेले नाही. शुन्य हा एक बिंदुसमान पदार्थ असुन त्याला आशय आहे परंतु त्याला लांबी रुंदी नाही

23) तथागत बुध्दांचा उपदेश असा कि सर्व वस्तु अनित्य आहेत

24) तथागत बुध्दांच्या ह्या सिंध्दातापासुन बोध काय घ्यावयाचा हा अति महत्वाचा प्रश्न आहे.

25) या अनित्यतेच्या सिध्दांतापासुन असा बोध घ्यावयाचा की, कोणत्याही वस्तुसंबधी आसक्ती राखु नका

26) लोकांनी मालमत्ता , मित्र इत्यादीसंबंधी अनासक्तीचा अभ्यास करण्यासाठीच तथागत बुध्दांनी म्हटले की, सर्व वस्तु अनित्य आहेत

" समतेच्या विचारांच्या प्रत्येक व्यक्तीने प्रत्येक रविवारी बुध्द  विहारात " सकाळी "  गेलेच पाहिजे "
*******
           विश्वरत्न  
   डाँ.बाबासाहेब आंबेडकर

No comments:

Post a Comment