Friday, 9 September 2016

🔷आरक्षणावरील लेख🔷 आरक्षणावरील लेख संवेदनशील वाचकांनी जरुर वाचावा... 🔸वृत्तरत्न 🔸 "🔹दै जनतेचा महानायक🔹" दि.2 सप्टेंबर 2016 चा संपुर्ण महाराष्ट्रात गाजलेला लेख " आरक्षण : एक विश्लेषण "

🔷आरक्षणावरील लेख🔷


आरक्षणावरील लेख संवेदनशील वाचकांनी जरुर वाचावा...
        🔸वृत्तरत्न 🔸
"🔹दै जनतेचा महानायक🔹"
    दि.2  सप्टेंबर  2016 चा
        संपुर्ण महाराष्ट्रात
          गाजलेला लेख                  " आरक्षण : एक विश्लेषण "
 
  लेखक : विशाल जाधव...


आरक्षण हा विषय खुपच जोर धरत आहे.लोक काय वाट्टेल ते याविषयी बोलत आहेत.काही लोक म्हणतात आरक्षण बंद करा,काही म्हणतात आरक्षण आर्थिक आधारावर द्या,काही म्हणतात धर्मावर द्या,काही म्हणतात आम्हाला नाही दिलं तर कोणालाच देउ नका ! अशी आरक्षणाच्या मागणीची ओरळ सुरु आहे.याविषयी घेतलेला विश्लेषणात्मक आढावा.
     मुळात आरक्षण म्हणजे काय?याचा लोक सरळसरळ अर्थ लावतात " राखीव जागा " म्हणजे अर्थातच आरक्षण .! यातच ते लोक गोंधड करतात .ते स्वत संभ्रमित असतात आणि ईतरांनाही संभ्रमित करतात. "आरक्षण " याचा सोपा आणि खरा अर्थ " किमान प्रतिनिधित्वाची संधी होय " ( minimum opportunity for representation ) प्रतिनिधित्व कोणाचे? तर त्या लोकांचे ज्या लोकांना हजारो वर्षे त्यांच्या मुलभुत हक्कांपासुन,विकासापासुन,वंचित ठेवले त्यांच्या उत्कर्षाची संधी जी नाकारली गेली तो उत्कर्ष साधण्यासाठी दिलेली संधी होय.
      मुळात आरक्षणाची सुरुवात कोणी केली? डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांनी?अज्जिबात नाही!,शाहु महाराजांनी?बिलकुल नाही.महात्मा फुलेंनी ?कदापि नाही.तर याची सुरुवात केली हिंदु धर्माचा शिल्पकार मनुने...! किती टक्के?तर १००%.ब्राम्हण,राजे,उच्चवर्णीय या सर्वांसाठी संपुर्ण आरक्षण होते.१००% राज्यसत्ता यांची,१००% धर्मसत्ता यांचीच,१००% शेतजमिनी यांच्याच ताब्यात,१००% व्यापार यांच्या तावडीत,१००% संपत्ती यांच्या मालकीची.असे सर्व अधिकार आणि संपत्ती याची मिरासदारी यांच्याकडे हजारो वर्षे होती.आणि बाकिचे लोक ईतके मागासलेले,ईतके अञानी राहीले कि त्यांच्या शेकडो पिढ्या तशाच राहील्या.त्यांना स्वाभिमान काय असतो,शिक्षण काय असते,मानवी मुल्ये काय,जगण्याचा हेतु काय ? हेच कळलं नाही.आणि याचा परिपाक असा झाली कि एकुण संपुर्ण जातीच्या जाती वंचित राहील्या.गुलाम बनल्या..!
    आर्थिक आधारावर आरक्षण मागने मुर्खपणाचे आहे.!आरक्षण हा गरीबा हटावचा कार्यक्रम नाही.(Reservation is not for the bread and butter,but it is for the participation in administration.policy making and decision making.आरक्षण हा भाजी भाकरीचा खेळ नाही.तर प्रशासनामध्ये सहभागासाठी आहे.योजना आणि निर्णय घेण्यामध्ये.आजचा गरीब उद्या श्रीमंत होउ शकतो तर आजचा श्रीमंत उद्या गरीब होउ शकतो.जे गरीब आहेत त्यांच्या उत्कर्षासाठी ईतर मार्ग आहेत.त्याच्यासाठी वेगळ्या रंगाचे रेशनकार्ड आहे,कमी किमतीत धान्य मिळते,सबसिड्या आहेत,जिवनदायी योजना आहेत,कमी उत्पन्नावर आधारीत शिष्यवृत्याही आहेत,अश्या अनेक योजना आहेत.आणि हवे असल्यास शासन आणखी राबवु शकतो.पण हे सर्व मागण्याचा मार्ग आरक्षण नाही.
     डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांचे एक वाक्य येथे खुप काही सांगुन जाते." तुम्ही गरीब आहात म्हणुन अस्पृष्य नाही आहात तर तुम्ही अस्पृष्य आहात म्हणुन तुम्ही गरीब आहात.गरीब तर समाजात ब्राम्हणही असतो.कधी कोण त्याच्यावर अन्याय करण्याची हिम्मत करतो का? "म्हणुन आरक्षण हे व्यक्तीकेंद्री म्हणजे एका विशिष्ट माणसाला नाही तर एका विशिष्ट जातीला दिले आहे.काही मुर्ख म्हणतात कलेक्टरचा मुलगाही आरक्षण घेतो.अरे.! जातीची संपुर्ण टिम, लॉबी असते,एक वर गेला याचा अर्थ पुर्ण जात वर गेली असा त्याचा अर्थ होत नाही.माणुस कितीही मोठ्या पदाला गेला तरी अवहेलना येतेच वाट्याला येतेच.उदा.एखाद्या कार्यालयात जसे दलित असतात तसेच दलित्तेतरही असतात.एखादा फडके,बापट,साने,गोखले, चुकी करत असेल तर लोक त्या त्या व्यक्तीला दोष देतात पण एखादा,कांबळे,पडांगळे,वगैरे चुका करत असेल तर " ये साला जातही ऐंसा है .! " असं म्हणुन सरसकट संपुर्ण दलित  समाजाची निंदा केली जाते यामागे दडलेली जातीयतेची सुप्त भावना असते.म्हणुन गरीब श्रीमंत बनु शकतो.मात्र दलित कितीही मोठा बनु द्या तो दलितच राहतो.
      आर्थिक आधारावर आरक्षण हे दिलेलेच आहे ओबीसींनी.ओबीसीमध्ये साळी,कोळी,याचबरोबर माळी,कुणबी या शेतकरी जातीबरोबरच दैवेञ ब्राम्हण या उच्चवर्णीय जातीचासुद्धा समावेश आहे.ओबीसींना आरक्षणाचा निकष सामाजिक,आर्थिक,शैक्षणिक मागासलेपण हा आहे.त्याला क्रिमीलियरची अट लावली आहे.कारण जर ओबीसींची सामाजिक,शैक्षणिक,आर्थिक उत्थान झाले तर यांना वगळता येते.अशाप्रकारे उच्च जातीनाही आरक्षण दिले आहे.तरीही आरक्षणचा बैजो लोक वाजवत आहेत.एससी आणि एसटीचे निकष अस्पृष्यता आणि शोषण आहे.कारण ते कितीही मोठ्या पदावर गेले तरीही उच्चनिच्चतेची त्यांच्याद्दलची भावना जात नाही.
      लोक म्हणतात ते सर्व सोडा आरक्षण कधी संपणार? मी अगोदरच सांगितल्याप्रमाणे आरक्षण म्हणजे प्रतिनिधित्व.मग प्रतिनिधित्व संपायला पाहीजे का? लोक याच्या खोलवर जात नाहीत आणि नंतर मुर्खात निघतात.समजा १०० जागा आहेत भरायच्या नोकरीच्या.यामध्ये प्रत्येक जातीचे लोक यायला पाहीजे.पण दुदैवाने या पदावर दलितांची पदे भरली जात नाही.कारण उमेदरवार निवडणारेच उच्चवर्णीय असतात..!आणि म्हणुनच मागासलेल्या जाती आणखीनच मागास राहतात.
     दिल्लीत कँबीनेट सचिवांच्या ९६ पदे( posts) आहेत.यात sc किती तर १ फक्त एक?obc किती? तर ४म्हणजे उरलेल्या जागा उच्चवर्णीयांच्या ताब्यात!मग मली सांगा अनुशेष ( backlog) भरला जात नाही आणि वरुन म्हणतात आरक्षण बंद करा? अगोदर अनुशेष भरा मग बोला.
     काही माणसं(?) म्हणतात स्वातंत्र्याची एवढी वर्षे झाली तरी लोक आरक्षण घेतात.मात्र हे लेक तेव्हा जाणिवपुर्वक विसरतात कि एवढ्या वर्षांनीही हे लोक जातियता पाळतात.अन्याय-अत्याचारांच्या घटनांत घट होण्याऐवजी वाढच होत आहे.उत्तर प्रदेशमध्ये एका मागासवर्गीय मुलीची फक्त सावली पाण्यावर पडली म्हणुन तिला मारलं,नुकतचं लातरमध्ये शेतात चांगलं पिक आलं म्हणुन जनावरे घातली शेतात.विरोध केला तर मारहाण केली जबर,पी.एच.डी.करणारा हुशार विद्यार्थी रोहीत वेमुला याला त्रास देउन आत्महत्येस प्रवृत्त केले,एके ठिकाणी संपुर्ण मागासवर्गीय कुटुंबाला जाळलं ,निष्पाप मले बळी पडली,पंजाबमध्ये दलिताना ट्रँक्टरखाली चिरडुन मारले,फक्त डॉ.बाबासाहेब आंबेडकरांच्या गाण्याची रिंगटोन म्हणुन शिर्डीत तरुणाला मारलं नंतर रिक्षा अंगावरु  नेली,रोज बहिष्कार घातले जात आहेत.शासन प्रशासन काही करत नाही.कारण त्यामध्ये यांचेच लोक असतात.!आणि म्हणुनच मोक्याच्या ठिकाणी बहुजनांनी,मागासवर्गीयांनी जायला हवे.म्हणुनच आहे आरक्षण.
      आरक्षण आपल्याच देशात नाही तर ईतरही देशात आहेत.अमेरिकेच्या अफेर्मेटिव अँक्शन पॉलिसीमध्ये श्वेत अमेरिकेनबरोबर अश्वेत अमेरिकन,ई.यांनाही प्रतिनिधित्वाची संधीची तरतुद केलेली आहे.आरक्षणाच्याबाबतीत नेहमीच गुणवत्तेचा बाउ केला जातो.जसकाही गुणवत्ता ही  मिरासदारी आहे.अरे.!जरी आरक्षण असलं तरी त्याला शिक्षण घ्यायलाच लागते.एखादी पोस्ट असली आणि आरक्षण आहे म्हणजे केणत्याही अडाणी माणसाला नाही निवडत.त्यालाही शिक्षण पुर्ण करावं लागतं.तोही त्याच शाळेत शिकतो ज्या शाळेत उच्चवर्णीय शिकतो,तोही तोच अभ्यास करतो जो उच्चवर्णीय करतो,त्यालाही तेच शिक्षक शिकवतात जे उच्चवर्णीयाला शिकवतात,तोही तिच परिक्षा देतो जो उच्चर्णीय देतो, पास होतो,मगच निवडला जातो.असे असुनही जर कोणी गुणवत्तेचा बाउ करत असेल तर ते बालिश आणि मुर्खपणाचे आहे असं मला वाटते.मेरिटचा प्रश्नच येत नाही.उदा.समजा घोड्यांची शर्यत चालु आहे.पण एक घोडा लंगडा आहे.तगड्या घोड्यांनी जाणिवपुर्व लंगडं केलं त्याला .मग कशी होणाल शर्यत?मेरीट माय फुट ! त्या घोड्याला रेषेच्या थोडं पुढे उभ करावं लागेल तरच शर्यत होईल खरी.यालाच म्हणतात आरक्षण.
     जाती नष्ट व्हायवा पाहीजे.तरच आरक्षण नष्ट होईल.आरक्षण हे जरी कृत्रिम असलं तरी एकप्रकारे त्याला नैसर्गिकच म्हणावे लागेल.कारण आरक्षणामुळे नैसर्गिक मानवी हक्क मिळतात.आरक्षण दुसरं तिसरं काहीच नसुन फक्त प्रतिनिधित्व्ची संधी आहे.आरक्षणामुळे देश मागे जात आहे अशी ओरड आरक्षणविरोधी लोक करतात.खरंतर आरकिषणामुळेच देश पुढे जात आहे.कारण त्या लोकांनाही संधी मिळत आहे जे लोक हजारो वर्षापासुन वंचित होते.देश कोणत्या गोष्टीमुळे मागे जात आहे तर जातियतेमुळे.
     आरक्षण हे ५०% पेक्षा जास्त नसते.म्हणजे यी देशातले ८५-९० % लोकांमधुन फक्त ५०% लोक निवडतील आणि उरलेल्या ५०% जागेवरती जे अल्पसंख्येने आहेत ते सर्व निवडतील..! अलिकडेच वाचणात आलं कि एससीच्या त्याच्याकडे संपुर्ण गुणवत्ता असुनही केवळ त्याने ओपनमधुन फॉर्म भरला आणि मुलाखतीमध्ये त्याला सांगितलं अस करता येणार नाही म्हणुन.बघा ही मानसिकता.
      रात्रच नाही दिवसही  तर प्रत्येक क्षण वैर्याचा आहे.प्रतिकारासाठी तयार रहा.आज आपल्या संरक्षणासाठी डॉ.बाबासाहेब आंबेडकर नाहीत.पण त्यांची शिकवन "  शिका ,संघटित व्हा,आणि संघर्ष करा" ही आपल्यासोबत आहे.याचा आपण प्रत्येकाने गांभीर्यपुर्वक अंगिकार केला पाहीजे.आजच्या सुशिक्षित तरुनांनी समाजात याविषयी जागरुकता निर्माण करायला हवी.लाचाराने नाही जगायला पाहीजे.आरक्षण हे कोणाच्या बापाने नव्हे तर सर्वांचा बाप डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांनी संविधानात अंतर्भुत केले आहे.त्यांच्यामुळेच आपण आहोत.हे कायम लंक्षात ठेवायला पाहीजे.नाहीतर परत कमरेला झाडु आणि गड्यात मडकं...!

🔹🔸🔹🔸🔹🔸🔹🔸🔹

विशाल जाधव सर.
8286223097
 (Mumbai)

🔵🔷🔵🔷🔵🔷🔵🔷🔵
👆👆👆👆👆👆👆👆👆
वरील आरक्षणावरील विशाल सरांचा लेख  प्रत्येकाने वाचा. कधी वेळ आलीच जर त्या लोकांचे तोंड बंद करण्याची तर घाबरु नका.हिमतीने त्यांना सामोरे जा.......
🔵🔴🔷🔶🔶🔷🔴🔵

No comments:

Post a Comment