Wednesday, 15 June 2016

#‎दाभोळकर_हत्या_प्रकरण‬

‪#‎दाभोळकर_हत्या_प्रकरण‬
सनातन्यांना कोणी अभय दिले व देत आहेत ?
विरेंद्र तावडे हा कटाचा सुत्रधार.. सारंग अकोलकर ने झाडल्या गोळ्या..!!
आज समजले की गोगलगाय सारखी भूमिका घेत काँग्रेस-राष्ट्रवादी सरकारने व महत्वाचे सुशील कुमार शिंदे व आर.आर. पाटील यांनी कुचकामी प्रयत्न करत या प्रकरणावर दुर्लक्ष केले होते.
भाजपा सरकार आज आले आहे पण गेल्या इतक्या वर्षात सनातन्यांचे हात इतके बळकट कसे काय झालेत ? एकीकडे 'सिमी' या संघटनेवर दहशतवादी संघटना म्हणत बंदी आणली गेली परंतु तिच वेळ 'सनातन' वर का नाही आली ? याचा अर्थ सनातन्यांना अप्रत्यक्षच अभय दिले गेले का ?
सनातन प्रभात या त्यांच्या मुखपत्रातुन सरळसरळ आग ओतली जात होती परंतु यावर पूर्णपणे दुर्लक्ष केले गेले. असे का ?
'सत्य मेव जयते' ऐवजी 'शस्त्र मेव जयते..'
धर्मासाठी धर्माच्या लढाईत जो मध्ये येणार त्याला संपवले जाणार..
पोलिस देखील अडथळा आल्यास त्यांनाही संपवण्यात येईल व त्यांच्या विरोधात लढायला हिंदू तरुणांना तयार करण्यात येत होते, शिवाय ही भुमिका ते लोक उघडपणे मांडत होते.
यासाठी साधकांकडून शस्त्र चालवायच्या कवायती करुन घेतल्या गेल्या.
विशेषतः 'रायफल' बंदूकी चालवायला मोजक्याच साधकांना प्रशिक्षित करण्यात आले होते, हेच ते मोजके प्रशिक्षणार्थी जे दाभोळकर, पाणसरे, कलबुर्गी यांच्या हत्येचे सुत्रधार व मारेकरी असल्याचा दाट संशय केला जात आहे.
या सर्वासाठी सनातनच्या जयंत आठवले यांनी फोटोसहित सनातन प्रभात मध्ये ही उघड उघड भूमिका मांडलेली होती.
ज्यांना ज्यांना संपवायच आहे त्या लोकांचे फोटो त्यांनी मुखपत्रात छापुन फोटोवर फुल्या मारलेल्या होत्या यापासुन आपण सर्व ज्ञात आहोत.
भयानक तर ही बातमी आहे की, सनातन्यांनी साधकांना हिंदू धार्मिक दहशतवादी होण्यास प्रोत्साहन दिलेले आहे, व तसे धार्मिक दहशतवादी होण्यासाठी तरुणांना भडकावण्याचे काम सनातनी लोक नेहमीच करत आलेत,जे की सर्व उघडपणे चालू आहे . धार्मिक दहशतवादी याच शब्दात त्यांनी मुखपत्रातुन मत मांडले आहे. तरीही सरकार कडून यासारख्या धार्मिक दहशतवाद्यांना का पाठीशी घातले गेले व आजही का पाठीशी घातले जात आहे ? जे की उघड व सर्वश्रुत आहे.
खरच ही खुप भयानक व धक्कादायक बाब आहे की अशा धर्मांध प्रवृत्तींना काही लोक देशाच्या ऐक्य व शांततेच्या विरोधात वातावरण निर्माण करुन भारतासारख्या विविधतेत एकता असलेल्या देशाला आखाती राष्ट्रासारखेच मरणाच्या खाईत ढकलण्याचे देशविघातक काम सुरु असताना लोकांच्या मनात भितीदायक व अविश्वासाचे वातावरण निर्माण होत असतांना जनता सरकारच्या ठोस निर्णयाच्या व कारवाईच्या प्रतिक्षेत आहेत.
"काँग्रेस-राष्ट्रवादी; सेना-भाजपा हे सर्व एकाच माळेचे मणी" असे बोलले जाते हे वाक्य सरकारने न्यायालयीन कारवाईने जनतेला चूकीच ठरवण्याची माझ्यासारखा तरुण वाट पाहतोय...!
‪#‎सत्य_मेव्_जयते‬ 
‪#‎Ban_Sanatan‬#Ban_RSS
‪#‎Raj_Gawai‬

No comments:

Post a Comment