Thursday, 16 June 2016

OBC बांधवांचा स्पर्श विटाळ का मानला जात नव्हता ?

OBC बांधवांचा स्पर्श विटाळ का मानला जात नव्हता ?

कारण

मनुस्मृती ही भारताची संविधाना पुर्वीची घटना होती आणि मनुस्मृती नुसार OBC शुद्र होते.

ब्राम्हणांची सेवा करण्यासाठी त्यांना बिनपगारी चाकरांची आवश्यकता होती आणि सेवा करवुन घेण्यासाठी OBC बांधवांचा स्पर्श होणे अटळ होते.

म्हणून OBC बांधवांकडून सेवा करून घेण्यासाठी स्पर्श न करण्याची आटकळ ठेवली नाही..म्हणजे ब्राम्हणाला आरामदायी बसण्यासाठी खुर्ची पलंग सुतार बांधवांनी तयार करून द्यायची.....

न्हावी बांधवांनी ब्राम्हणांची हजामत करून द्यायची.....

कुणबी मराठा बांधवांनी शेतमाल आणि धान्य पिकवुन द्यायचे....

माळी बांधवांनी भाजीपाला पिकवुन द्यायचा..

आणिहे सर्व ब्राम्हणांसाठी विनामोबदला केले जायचे.

कारण ही सेवा होती.

आणि सेवा केलेल्या गोष्टीचा मोबदला मागायचा नसतो.

ओबीसी बांधवांचा गैरसमज- डाॅ. बाबासाहेब आंबेडकरांनी आमच्यासाठी काय केले ??

उत्तर-- मनुस्मृती ने ओबीसी बांधवांना शिक्षण घेण्यास मनाई केली होती... बाबासाहेबांनी संविधानामधे(भारतीय राज्य घटनेत) शिक्षण घेण्याचा आधिकार दिला

मनुस्मृतीच्या कायद्यानुसार मुलाला वडीलांचा पिढीजात व्यवसाय करावा लागत होता...

म्हणजे

कुणब्याचा मुलगा कुणबी

सुताराचा मुलगा सुतार

न्हाव्याचा मुलगा न्हावी

कुंभाराचा मुलगा कुंभारच व्हायचा

धनगराचा मुलगा मेंढया वळवणारा

आता ओबीसी बांधवांची मुले डाॅ. बाबासाहेबांनी दिलेल्या (संविधानिक) घटनेच्या आधिकांमुळे IAS, IPS, IRS, IFS डाॅक्टर, इंजिनियर , प्राध्यापक बनु शकले

मराठा बांधवांचा नेहमीचा प्रश्न आम्ही हुशार होतो मार्क्स पाडले म्हणून शिकलो ....?

उत्तर ......अरे राजा, तु हुशार होतास हे मान्य आहे. पण तूला तुझी हुशारी दाखवण्याची संधी कोणी दिली ?

तुझे आजोबा, पंजोबा सुद्धा हुशारच होते. पण तरीही ते IAS, IPS , IRS, IFS डाॅक्टर, इंजिनियर ,प्राध्यापक बनु शकले नाहीत.

कारण त्यांना हुशारी दाखवायची संधीच मिळाली नाही, कारण तेही शुद्रच, आठव शिवाजी महाराजांचा राज्यभीशेक

तुझ्या घराण्यात काय तुच एकटा आधिकारी होण्यासाठी लायक होतास आणि तुझे आजोबा पंजोबा  होत काय होते?

मुळनिवासी लोक जेव्हा तुलना करतील की आमच्या पुर्वजांचे जीवन उकीरड्यावरच्या जनावरासारखे होते मग आमचे जीवन सोन्यासारखे कसे झाले ?

तेंव्हा लोक खरा इतिहास वाचतील आणि त्यांना समजेल की हे डाॅ. बाबासाहेब आंबेडकरामुळे शक्य झालय...!!
शिव, फुले, शाहू, आंबेडकर अशा थोर समाज सुधारकांना माझा मानाचा मुजरा…

No comments:

Post a Comment